IND vs AUS: आता ऑस्ट्रेलियाकडून वनडे वर्ल्डकपचा बदला घेणार भारत, कांगारूंना टी-२० वर्ल्डकपमधून करणार बाहेर?

  57

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सोमवारी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा सामना करो वा मरो असा आहे. जर या सामन्यात त्यांचा पराभव झाला तर सेमीफायनलमध्ये जाण्याच्या त्यांच्या आशा फारच कमी होतील. तर टीम इंडियाकडे कांगारूंकडून २०२३मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या फायनलमधील पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



या पद्धतीने ऑस्ट्रेलिया होणार बाहेर


जर रोहित ब्रिगेडने सोमवारी ऑस्ट्रेलियाला हरवले आणि अफगाणिस्तानने सुपर ८मधील आपला शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाद होतील. कागारूंनी २०२३वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताला हरवले होते. अशातच टीम इंडियाकडे या पराभवाचा बदला घेण्याची संधी आहे.



पाऊस बनू शकतो व्हिलन


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यावर पावसाचे सावट आहे. दोन्ही संघादरम्यानचा सामना सेंट ल्युसिया येथे खेळवला जाणार आहे. रविवारी येथे जोरदार पाऊस झाला. सोमवारीही येथे पावसाची शक्यता आह. जर हा सामना पावसाने धुतला गेला तर ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसू शकतो.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार