Raj Thackeray : पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?

जातीपातीच्या वादावर राज ठाकरे यांचा संतप्त सवाल


मुंबई : राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी (Maratha Vs OBC) संघर्ष पेटला आहे. दोन्ही समाजांच्या परस्परविरोधी मागण्यांमुळे राज्य सरकार (State government) कोंडीत सापडलं आहे. सामान्य माणसंच नव्हे तर राजकीय नेतेही या जातीपातीच्या वादावर टोकाची वक्तव्ये करत आहेत. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी 'पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार?', असा संतप्त सवाल उपस्थित केला. निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी राज्यातील जातीय आरक्षणावरून (Caste reservation) सुरू असलेल्या वादावर आपली भूमिका मांडली.


राज ठाकरे म्हणाले, मी इतकी वर्षे सर्व समाजाला सांगतोय, या जातीपातीच्या वादातून काही निष्पन्न होणार नाही. हे सगळे पुढारी जातीपातीत द्वेष पसरवून फक्त मते हातात घेतील. आता लहान लहान मुलं जातीपातीवरून एकमेकांशी बोलतायेत. हे शाळा कॉलेजपर्यंत विष जाईल हे मी आधी सांगितले होते. जातीपातीचं विष कालवणाऱ्या लोकांना महाराष्ट्रानं दूर ठेवलं पाहिजे, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.


पुढे ते म्हणाले, जातीय विष महाराष्ट्रात कधीही नव्हते. कितीही आवडणारा पक्ष असेल किंवा नेता असेल पण असं जर ते करणार असतील तर पुढच्या पिढीने जगायचं कसं? महाराष्ट्राचं काय होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. त्याशिवाय ज्याप्रकारे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये सुरू आहे तसं महाराष्ट्रात यावरून रक्तपात होईल अशी भीती राज ठाकरेंनी वर्तवली.



मराठा-ओबीसी आरक्षणावरून वाद


राज्यात मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने आंदोलन करत आहेत. तर ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सध्या मराठा-ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. त्यात जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला १३ जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

Comments
Add Comment

Shocking Video : किळसवाणा प्रकार! दादरमध्ये इडली बनवण्यासाठी चक्क शौचालयाच्या पाण्याचा वापर; व्हिडिओ व्हायरल

मुंबई : कामावर जाण्याची घाई आणि वेळेची कमतरता यामुळे अनेक मुंबईकर चाकरमानी सकाळचा नाश्ता रेल्वे स्टेशनबाहेरील

Passengers Stranded At Mumbai Airport : मुंबईत एअर इंडियाची विमानसेवा कोलमडली; ताटकळलेल्या प्रवाशांचा संताप

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) १८ मे रोजी एअर इंडिया (Air India) आणि एअर इंडिया

Sion Flyover Mumbai : मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सायन उड्डाणपूल १५ ऑगस्टला खुला होण्याची शक्यता

मुंबई : मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शीव (Sion)

Ladki Bahin Yojana : ई-केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही

आमचा अजेंडा सत्तेची खुर्ची मिळवणे नाही तर लोकांच्या मनात आपली जागा निर्माण करणे आहे अंधेरीतील लाडक्या बहिणींचा

Ashwini Bhide : इंधन बचतीसाठी महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचा पुढाकार

मुंबई (सचिन धानजी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेच्या वापराबाबत

Khar tree collapse : खारमध्ये रिक्षावर झाड कोसळल्याने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू

मुंबई : खार (पश्चिम) येथील लिंकिंग रोडवर राजकुमार ज्वेलर्सजवळ रिक्षावर झाड कोसळल्याने,१४ वर्षीय मुलीचा मृत्यू