T-20 world cup 2024: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपमध्ये असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले आहे. सलग ४ सामन्यांत विजय मिळवताना भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. शनिवारी बांगलादेशला टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात हरवले होते. बांगलादेशने भले हा सामना गमावला असला तरी संघाच्या वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसनने इतिहास रचला. त्याच्याआधी कोणत्याच खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.


खरंतर, शाकिब अल हसन टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ५०वा बळी रोहित शर्माचा घेतला. तो टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. शाकिब अल हसनने भारताविरुद्ध ३ ओव्हर गोलंदाजी केली मात्र तो महागडा ठरला. शाकिबने ३ षटके बॉलिंग करताना १२.३० इकॉनॉमीने धावा केल्या आणि केवळ एक विकेट घेतला. ५० विकेट मिळवण्यासाठी त्याला ४२ सामन्यांची गरज पडली.


टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ५ गोलंदांजांबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या स्थानावर शाकिब अल हसन आहे. यानंतर शाहीद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यासारखे खेळाडू आहेत. या यादीत कोणताही भारतीय गोलंदाज नाही. या गोलंदाजांनी अनुक्रमे ३९,३८,३७ आणि ३६ विकेट आपल्या नावे केले आहेत.


या यादीतील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. शाहिद आफ्रिदी आणि लसिथ मलिंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. तर शाकिब अल हसन, वानिंगु हसरंगा आणि अॅडम झाम्पा हे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.