T-20 world cup 2024: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपमध्ये असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले आहे. सलग ४ सामन्यांत विजय मिळवताना भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. शनिवारी बांगलादेशला टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात हरवले होते. बांगलादेशने भले हा सामना गमावला असला तरी संघाच्या वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसनने इतिहास रचला. त्याच्याआधी कोणत्याच खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.


खरंतर, शाकिब अल हसन टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ५०वा बळी रोहित शर्माचा घेतला. तो टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. शाकिब अल हसनने भारताविरुद्ध ३ ओव्हर गोलंदाजी केली मात्र तो महागडा ठरला. शाकिबने ३ षटके बॉलिंग करताना १२.३० इकॉनॉमीने धावा केल्या आणि केवळ एक विकेट घेतला. ५० विकेट मिळवण्यासाठी त्याला ४२ सामन्यांची गरज पडली.


टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ५ गोलंदांजांबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या स्थानावर शाकिब अल हसन आहे. यानंतर शाहीद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यासारखे खेळाडू आहेत. या यादीत कोणताही भारतीय गोलंदाज नाही. या गोलंदाजांनी अनुक्रमे ३९,३८,३७ आणि ३६ विकेट आपल्या नावे केले आहेत.


या यादीतील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. शाहिद आफ्रिदी आणि लसिथ मलिंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. तर शाकिब अल हसन, वानिंगु हसरंगा आणि अॅडम झाम्पा हे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने