T-20 world cup 2024: शाकिब अल हसनने रचला इतिहास, टी-२० वर्ल्डकपमध्ये असे करणारा ठरला पहिला गोलंदाज

मुंबई: भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये खेळलेले सर्व सामने जिंकले आहे. सलग ४ सामन्यांत विजय मिळवताना भारताने सेमीफायनलचे तिकीट निश्चित केले आहे. शनिवारी बांगलादेशला टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात हरवले होते. बांगलादेशने भले हा सामना गमावला असला तरी संघाच्या वरिष्ठ खेळाडू शाकिब अल हसनने इतिहास रचला. त्याच्याआधी कोणत्याच खेळाडूने ही कामगिरी केलेली नाही.


खरंतर, शाकिब अल हसन टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने ५०वा बळी रोहित शर्माचा घेतला. तो टी-२० वर्ल्डकपमध्ये ५० विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे. शाकिब अल हसनने भारताविरुद्ध ३ ओव्हर गोलंदाजी केली मात्र तो महागडा ठरला. शाकिबने ३ षटके बॉलिंग करताना १२.३० इकॉनॉमीने धावा केल्या आणि केवळ एक विकेट घेतला. ५० विकेट मिळवण्यासाठी त्याला ४२ सामन्यांची गरज पडली.


टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या ५ गोलंदांजांबाबत बोलायचे झाल्यास पहिल्या स्थानावर शाकिब अल हसन आहे. यानंतर शाहीद आफ्रिदी, लसिथ मलिंगा, वानिंदु हसरंगा आणि अॅडम झाम्पा यासारखे खेळाडू आहेत. या यादीत कोणताही भारतीय गोलंदाज नाही. या गोलंदाजांनी अनुक्रमे ३९,३८,३७ आणि ३६ विकेट आपल्या नावे केले आहेत.


या यादीतील दोन खेळाडूंनी निवृत्ती घेतली आहे. शाहिद आफ्रिदी आणि लसिथ मलिंगा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले आहे. तर शाकिब अल हसन, वानिंगु हसरंगा आणि अॅडम झाम्पा हे अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहेत.

Comments
Add Comment

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार विश्वविजेत्या महिला टीम इंडियाची भेट

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वन डे विश्वचषक 2025 मध्ये ऐतिहासिक विजय मिळवत भारताचे नाव जगभरात गौरवाने

भारतीय संघातील महाराष्ट्रातील तीन महिला खेळाडूंना बक्षीस जाहीर

मुंबई  : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील

महिला एकदिवसीय क्रमवारीत लॉरा वुल्फार्ट अव्वल

स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर घसरली; जेमिमाची 'टॉप १०' मध्ये दमदार एन्ट्री मुंबई : नुकताच महिला वनडे वर्ल्ड कप

वर्ल्डकप जिंकल्यावर हरमनप्रीतने सोशल मीडियातून दिला 'हा' संदेश

नवी मुंबई : भारतीय महिला संघाने आयसीसी महिला वर्ल्ड कप जिंकत इतिहास रचला आणि भारतीय क्रिकेटचा नवा अध्याय लिहिला.

जगज्जेत्या टीमचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना आवडतो 'हा' पदार्थ

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ वर भारतानं नाव कोरलं. ही किमया साधण्यासाठी टीम इंडियाला प्रेरित करणे आणि

कपिल देव आणि महेंद्रसिंग धोनीनंतर हरमनप्रीत कौरने रचला इतिहास

नवी मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा