Rickshaw Drivers Agitation : रिक्षाचालकांचा आक्रमक पवित्रा; उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा मोठा निर्णय!

प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता


मुंबई : मुंबईसह राज्यात साधारण १५ लाख रिक्षा चालक-मालक स्वयंरोजगारित आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य सरकार (State Government) ठरवते. मात्र कोरोना काळानंतर रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा हाती घेत उद्या राज्यभर आंदोलन (Rickshaw Drivers Agitation) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा संचालनासंदर्भात सर्व गोष्टी सरकारकडून ठरवल्या जातात. रिक्षाचालकांना कोरोनाकाळात केवळ १५०० रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशातच वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून ५० रुपये प्रतिदिवस या प्रमाणे रिक्षाचालकांवर विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या (सोमवारी) राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.


या दिवशी स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ज्या ठिकाणी कार्यालय नसतील त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे, असे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Weather Update : महाराष्ट्रासाठी पुढचे २४ तास महत्त्वाचे ! राज्यातील 3० जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच मान्सूनचे आगमन होणार ?

Mumbai : मुंबईसह राज्यातील काही भागात मंगळवारी (२३ जून ) ला पावसानी हजेरी लावली. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या

Nitesh Rane : ओसरगाव टोलनाक्यावर 'एमएच-०७' वाहनांना टोलमाफी

 पालकमंत्री नितेश राणे यांची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; स्वतंत्र मार्गिका, व्यावसायिक

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; पती-पत्नी ठार, दोन चिमुकल्यांसह चालक गंभीर

Buldhana : राज्यात रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) पुन्हा एकदा

Forest Minister Ganesh Naik : कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशात बिबट सफारी विकसित करणार

वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा; विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ताडोबाच्या धर्तीवर व्याघ्र प्रकल्प मुंबई :

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्र चालकांना दरमहा अनुदान देण्याबाबत शासन सकारात्मक मंत्री छगन भुजबळ यांचे विधान परिषदेत आश्वासन

बंद शिवभोजन केंद्रे पुन्हा सुरू करण्यास प्राधान्य; निधीसाठी अर्थ विभागाशी चर्चा करणार मुंबई : राज्यातील

Maharashtra Monsoon 2026 : राज्यात २४ ते २७ जूनदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यात मान्सून सक्रिय होण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण