Rickshaw Drivers Agitation : रिक्षाचालकांचा आक्रमक पवित्रा; उद्या राज्यभर आंदोलन करण्याचा मोठा निर्णय!

प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता


मुंबई : मुंबईसह राज्यात साधारण १५ लाख रिक्षा चालक-मालक स्वयंरोजगारित आहेत. रिक्षाच्या भाड्याचे दर, रिक्षा संचालनासंदर्भातील सर्व अटी व शर्ती राज्य सरकार (State Government) ठरवते. मात्र कोरोना काळानंतर रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. यामुळे राज्यातील रिक्षाचालकांनी आक्रमक पवित्रा हाती घेत उद्या राज्यभर आंदोलन (Rickshaw Drivers Agitation) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रिक्षा संचालनासंदर्भात सर्व गोष्टी सरकारकडून ठरवल्या जातात. रिक्षाचालकांना कोरोनाकाळात केवळ १५०० रुपयांच्या मदतीशिवाय अन्य कोणतीही मदत सरकारने केली नव्हती. त्यामुळे रिक्षाचालकांना मोठ्या आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. अशातच वाहन योग्यता प्रमाणपत्र वैधता संपलेल्या तारखेपासून ५० रुपये प्रतिदिवस या प्रमाणे रिक्षाचालकांवर विलंब शुल्क आकारण्यात येत आहे. यामुळे रिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या (सोमवारी) राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.


या दिवशी स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि ज्या ठिकाणी कार्यालय नसतील त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर शांततामय आंदोलन करण्यात येणार आहे, असे संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मान्सूनचा मुक्काम लांबणीवर!

मराठवाड्यासह विदर्भात अस्मानी संकट आणखी गडद होणार मुंबई : पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातलेला असतानाच जाता-जाता

बंदरे विकास आणि जहाज बांधणी क्षेत्रात राज्यात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी

गुंतवणूकदारांनी राज्याच्या जहाज बांधणी उद्योगाच्या विकासात योगदान द्यावे - मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री

दांडिया खेळणे म्हणजे हांडगेपणा, संभाजी भिडेंचं वक्तव्य

सांगली : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौड कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना संभाजी भिडे

चंद्रपूर - वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे धक्के

चंद्रपूर : वरोरा तालुका परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसले असून वरोरा भूकंपाचे केंद्रबिंदू ठरले आहे. दरम्यान ३.२

सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार - मुख्यमंत्री

दिवाळीपूर्वी मदतीचे वितरण करणार टंचाई काळातील उपाययोजना अतिवृष्टीतही लागू करणार लातूर : राज्यात अनेक ठिकाणी

अतिवृष्टी व पुरामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच मदत – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे शेती, घर व पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान