Onion Prices: ग्राहकवर्गाला कांदा आता नाही रडवणार! सरकारने खरेदी केला हजारो टन स्टॉक

मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतीवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने बफर स्टॉकसाठी तब्बल ७१ हजार टन कांदा विकत घेतला आहे. कांद्यांच्या किंमतीने ४० रूपये प्रति किलोचा आकडा पार केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कांद्यांची घाऊक किंमत शुक्रवारी ३८.६७ रूपये किलो इतकी होती. सरकारला आशा आहे की येणाऱ्या काळात कांद्यांच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळेल.



यावर्षी ५ लाख टन खरेदीची तयारी


सरकारने किंमती स्थिर राखण्यासाठी या वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारला आशा आहे की देशातील अधिकांश भागात मान्सून वाढण्यासोबतच रिटेल किंमतीही कमी होतील.


याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जूनपर्यंत केंद्र सरकारने बफर स्टॉक म्हणून ७०,९८७ टन कांदा खरेदी केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७४,०७१ टन कांदा खरेदी करण्यात आला होता.



भीषण उन्हाळा आणि पावसामुळे उत्पादन घटल्याची शंका


यावर्षी भीषण उन्हाळा आणि कमी पावसामुळे रबी पिकांच्या उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. कांद्यांच्या वाढत्या किंमतीला हेच कारण जबाबदार आहे. त्यामुळेच या वर्षीही कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यास वेग आला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार या बफर स्टॉकचा वापर करेल. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार गेल्या ऑगस्टपासून पावले उचलत आहे. याआधी ४० टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.