मुंबई: केंद्र सरकारने कांद्याच्या वाढत्या किंमतीवर आळा घालण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने बफर स्टॉकसाठी तब्बल ७१ हजार टन कांदा विकत घेतला आहे. कांद्यांच्या किंमतीने ४० रूपये प्रति किलोचा आकडा पार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांद्यांची घाऊक किंमत शुक्रवारी ३८.६७ रूपये किलो इतकी होती. सरकारला आशा आहे की येणाऱ्या काळात कांद्यांच्या वाढत्या किंमतीपासून दिलासा मिळेल.
सरकारने किंमती स्थिर राखण्यासाठी या वर्षी ५ लाख टन कांदा खरेदीचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारला आशा आहे की देशातील अधिकांश भागात मान्सून वाढण्यासोबतच रिटेल किंमतीही कमी होतील.
याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार २० जूनपर्यंत केंद्र सरकारने बफर स्टॉक म्हणून ७०,९८७ टन कांदा खरेदी केला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ७४,०७१ टन कांदा खरेदी करण्यात आला होता.
यावर्षी भीषण उन्हाळा आणि कमी पावसामुळे रबी पिकांच्या उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता आहे. कांद्यांच्या वाढत्या किंमतीला हेच कारण जबाबदार आहे. त्यामुळेच या वर्षीही कांद्याचा बफर स्टॉक वाढवण्यास वेग आला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार या बफर स्टॉकचा वापर करेल. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार गेल्या ऑगस्टपासून पावले उचलत आहे. याआधी ४० टक्के एक्सपोर्ट ड्युटी लावण्यात आली.
पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या…
मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी 'देवमाणूस' (Devmanus) ही मालिका सुरु झाली…
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…