IND vs BAN: अँटिग्वामध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, बांगलादेशविरुद्ध केला हा रेकॉर्ड

  112

मुंबई: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजय मिळवला. भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये हा सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरी केली. भारताने या विजयासोबतच एक रेकॉर्डही आपल्या नावे केला. टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला सलग सर्वाधिक हरवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आली आहे.


खरंतर, टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्याही एका संघाला सलग हरवण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी बांगलादेशला सलग ६ वेळा हरवले आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनीही बांगलादेशला ६ वेळा हरवले आहे. या यादीत भारताचेही नाव जोडले गेले आहे. टीम इंडियाने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग ५ वेळा हरवले आहे.


शनिवारी रंगलेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माच्या २३, विराट कोहलीच्या ३७,ऋषभ पंतच्या ३६, त्यानंतर शिवम दुबेच्या ३४ आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद ५० धावांचा समावेश होता.


प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. यावेळी कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर अर्शदीप आणि बुमराह यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार