IND vs BAN: अँटिग्वामध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, बांगलादेशविरुद्ध केला हा रेकॉर्ड

  118

मुंबई: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजय मिळवला. भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये हा सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरी केली. भारताने या विजयासोबतच एक रेकॉर्डही आपल्या नावे केला. टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला सलग सर्वाधिक हरवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आली आहे.


खरंतर, टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्याही एका संघाला सलग हरवण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी बांगलादेशला सलग ६ वेळा हरवले आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनीही बांगलादेशला ६ वेळा हरवले आहे. या यादीत भारताचेही नाव जोडले गेले आहे. टीम इंडियाने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग ५ वेळा हरवले आहे.


शनिवारी रंगलेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माच्या २३, विराट कोहलीच्या ३७,ऋषभ पंतच्या ३६, त्यानंतर शिवम दुबेच्या ३४ आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद ५० धावांचा समावेश होता.


प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. यावेळी कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर अर्शदीप आणि बुमराह यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट