IND vs BAN: अँटिग्वामध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, बांगलादेशविरुद्ध केला हा रेकॉर्ड

मुंबई: टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध शानदार कामगिरी करताना विजय मिळवला. भारताने टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मध्ये हा सलग दुसरा विजय मिळवला. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांनी दमदार कामगिरी केली. भारताने या विजयासोबतच एक रेकॉर्डही आपल्या नावे केला. टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपमध्ये बांगलादेशला सलग सर्वाधिक हरवण्याच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर आली आहे.


खरंतर, टी-२० वर्ल्डकपमध्ये कोणत्याही एका संघाला सलग हरवण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यांनी बांगलादेशला सलग ६ वेळा हरवले आहे. तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनीही बांगलादेशला ६ वेळा हरवले आहे. या यादीत भारताचेही नाव जोडले गेले आहे. टीम इंडियाने बांगलादेशला टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग ५ वेळा हरवले आहे.


शनिवारी रंगलेल्या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद १९६ धावा केल्या होत्या. यात रोहित शर्माच्या २३, विराट कोहलीच्या ३७,ऋषभ पंतच्या ३६, त्यानंतर शिवम दुबेच्या ३४ आणि हार्दिक पांड्याच्या नाबाद ५० धावांचा समावेश होता.


प्रत्युत्तरादाखल बांगलादेशच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४६ धावाच करता आल्या. यावेळी कुलदीप यादवने सर्वाधिक ३ विकेट घेतले तर अर्शदीप आणि बुमराह यांना प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

Comments
Add Comment

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.

IND vs WI: भारताने ४४८वर पहिला डाव केला घोषित, २८६ धावांची घेतली आघाडी

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला तिसऱ्या दिवशी नाट्यमय

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत ध्रुव जुरेलचं पहिलं शतक! 'गन सॅल्यूट' करत केले सेलिब्रेशन

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा युवा यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव

IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताची घट्ट पकड, राहुल, जुरेल आणि जडेजाने ठोकले शतक

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी वेस्ट

IND vs WI: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, पहिल्याच दिवशी विंडीजचा संपूर्ण डाव कोसळला

अहमदाबाद: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र