मुंबई : सध्या देशभरात परीक्षांचा भलताच गोंधळ सुरु आहे. कधी पेपरफुटी तर कधी कॉपीचे भयंकर प्रकार उघडकीस येत आहेत. या प्रकरणांनी सर्वोच्च न्यायालय देखील गाठले आहे. त्यातच आता मृदा जलसंधारण विभागाच्या भरतीसंदर्भातही मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या विभागात ६५० पदांसाठी फेरपरीक्षा घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात ही परीक्षा पार पडणार आहे.
मृदा जलसंधारण विभागात गट ‘ब’ संवर्गातील पदांसाठी ही फेरपरीक्षा होणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी या अनुषंगाने सात शहरांतील १० टीसीएस आणि आयओएम कंपन्यांच्या अधिकृत केंद्रांवर ती घेतली जाणार आहे. या केंद्रांवर १४, १५ व १६ जुलै रोजी ही परीक्षा पार पडणार आहे. काही परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा फेरपरीक्षेचा निर्णय घेतला आहे.
अमरावतीच्या (Amravati News ) ड्रीमलँड परीक्षा केंद्रावर २० आणि २१ फेब्रुवारीला विविध पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. यावेळी परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याच्या घटनेने एकच गोंधळ उडाला होता. या घटनेत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्याकडूनच हा पेपर फोडला गेल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातल्यानंतर पोलिसांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी लावून धरत आंदोलनाचा इशारा दिला होता. परिणामी ही परीक्षा रद्द करण्याचे आदेश राज्याचे मंत्री संजय राठोड यांनी संबंधित विभागाला दिले व १५ मार्च रोजी ही भरती प्रक्रिया परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर आता राज्य सरकारने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…