Anil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या 'या' कंपनीची शेअरबाजारात तूफान तेजी

एक लाखाचे झाले तब्बल २३ लाख


मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारादरम्यान मोठे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. अशातच ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसूत येत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत २२०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.



एक लाखाचे झाले २३ लाख रुपये


अनिल अंबामी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' (Reliance Infrastructure) या कंपनीच्या शेअरचे मूल्य २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपये होते. २१ जून २०२४ रोजी हाच शेअर थेट २१४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदार कामगिरी करत त्याच्या मूल्यात २००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच गुंतवणूक दारांनी एक लाख रुपये गुंतवले असता आज त्याचे तब्बल २३.३५ लाख रुपये झाले असते अशी माहिती मिळत आहे.



एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढ


या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर १४७.७५ रुपयांवरून २१४.८५ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरध्ये १३७ टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ५२ आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य ३०८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांतील नीचांकी मूल्य १३४.८५ रुपये आहे.



विजय केडिया यांनी खरेदी केलेत ४०लाख शेअर्स


दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च २०२४ च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे ४० लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी १.०१ टक्का आहे.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने