Anil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या 'या' कंपनीची शेअरबाजारात तूफान तेजी

एक लाखाचे झाले तब्बल २३ लाख


मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारादरम्यान मोठे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. अशातच ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसूत येत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत २२०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.



एक लाखाचे झाले २३ लाख रुपये


अनिल अंबामी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' (Reliance Infrastructure) या कंपनीच्या शेअरचे मूल्य २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपये होते. २१ जून २०२४ रोजी हाच शेअर थेट २१४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदार कामगिरी करत त्याच्या मूल्यात २००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच गुंतवणूक दारांनी एक लाख रुपये गुंतवले असता आज त्याचे तब्बल २३.३५ लाख रुपये झाले असते अशी माहिती मिळत आहे.



एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढ


या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर १४७.७५ रुपयांवरून २१४.८५ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरध्ये १३७ टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ५२ आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य ३०८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांतील नीचांकी मूल्य १३४.८५ रुपये आहे.



विजय केडिया यांनी खरेदी केलेत ४०लाख शेअर्स


दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च २०२४ च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे ४० लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी १.०१ टक्का आहे.

Comments
Add Comment

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या

केरळमध्ये 'ब्रेन-इटिंग अमीबा'चा हाहाकार; १८ जणांचा बळी, ही लक्षणे दिसल्यास तातडीने व्हा सावधान!

नवी दिल्ली : केरळमध्ये पुन्हा एकदा 'ब्रेन-इटिंग अमीबा' (Brain-Eating Amoeba) चा धोका वाढला असून, या वर्षी या जीवघेण्या संसर्गाचे