Anil Ambani : गुंतवणूकदार झाले मालामाल! अनिल अंबानीच्या 'या' कंपनीची शेअरबाजारात तूफान तेजी

एक लाखाचे झाले तब्बल २३ लाख


मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) चढ-उतारादरम्यान मोठे उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या एका शेअरमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा शेअर खरेदी करण्यासाठी ऑनलाईन गुंतवणूकदारांची झुंबड उडाली आहे. अशातच ही कंपनी गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारावर चांगली कामगिरी करत असल्याचे चित्र दिसूत येत आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या चार वर्षांत २२०० टक्क्यांनी वाढ झाल्याने अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदार चांगलेच मालामाल झाले आहेत.



एक लाखाचे झाले २३ लाख रुपये


अनिल अंबामी यांच्या 'रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर' (Reliance Infrastructure) या कंपनीच्या शेअरचे मूल्य २७ मार्च २०२० रोजी ९.२० रुपये होते. २१ जून २०२४ रोजी हाच शेअर थेट २१४.८५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या चार वर्षांत या कंपनीने दमदार कामगिरी करत त्याच्या मूल्यात २००० टक्क्यांपेक्षाही जास्त वाढ झाली आहे. म्हणजेच गुंतवणूक दारांनी एक लाख रुपये गुंतवले असता आज त्याचे तब्बल २३.३५ लाख रुपये झाले असते अशी माहिती मिळत आहे.



एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढ


या कंपनीची एका वर्षातील कामगिरी पाहायची झाल्यास हा शेअर गेल्या एका वर्षात ४५ टक्क्यांनी वाढला आहे. या एका वर्षात या कंपनीचा शेअर १४७.७५ रुपयांवरून २१४.८५ रुपयांपर्यंत वाढला आहे. गेल्या दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरध्ये १३७ टक्क्यांची तेजी आली आहे. तर गेल्या एका महिन्यात या कंपनीचे शेअर २८ टक्क्यांनी वाढले आहेत. गेल्या ५२ आठवड्यांत या कंपनीच्या शेअरचे सर्वोच्च मूल्य ३०८ रुपये आहे. तर ५२ आठवड्यांतील नीचांकी मूल्य १३४.८५ रुपये आहे.



विजय केडिया यांनी खरेदी केलेत ४०लाख शेअर्स


दिग्गज गुंतवणूकदार विजय किशनलाल केडिया यांनीदेखील अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत मोठी गुंतवणूक केलेली आहे. ट्रेंडलाइनच्या डेटानुसार विजय केडिया यांनी मार्च २०२४ च्या तिमाहीत रिलायन्स इन्फ्राचे ४० लाख शेअर्स खरेदी केलेले आहेत. कंपनीत त्यांची एकूण हिस्सेदारी १.०१ टक्का आहे.

Comments
Add Comment

जगात २८ कोटी लोक नैराश्यात

 दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी ’जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना मानसिक

ऑक्टोबरमध्ये फिरायला जायचंय तर राजस्थान आहे एकदम बेस्ट

मुंबई : वाळवंटाची सुवर्ण वाळू, राजवाड्यांचे भव्य ऐश्वर्य, लोककलेचा रंग, आणि संस्कृतीचा सुगंध म्हणजे आपलं

नोबेल शांतता पुरस्कारासाठी ट्रम्प यांची वर्णी लागणार का ? आज होणार घोषणा

नॉर्वे : नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे आज नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. यावर्षी नोबेल शांतता

भारतातील कोणत्या राज्यात आणि जिल्ह्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके कुठे आहेत? जाणून घ्या इंटरेस्टिंग माहिती.

भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्थानके आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि कोणत्या जिल्ह्यात ४०

ब्रिटनची ९ मोठी विद्यापीठे भारतात कॅम्पस सुरू करणार; पंतप्रधान मोदी आणि कीर स्टार्मर यांची मोठी घोषणा

मुंबई: भारत-ब्रिटन संबंधांमध्ये शिक्षण आणि युवाशक्तीला बळ देणारा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. ब्रिटनचे

अयोध्या : घरात झालेल्या स्फोटामुळे इमारत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

अयोध्या : अयोध्या जिल्ह्यातील नगर पंचायत भदरसा भरतकुंडच्या महाराणा प्रताप वॉर्डातील पगलाभारी गावात जोरदार