Vidhanparishad Elections : विधान परिषदेच्या ११ पैकी नऊ जागा जिंकण्यासाठी महायुतीची मोर्चेबांधणी

महाविकास आघाडीकडे दोन जागा जिंकण्याइतपतच संख्याबळ


मुंबई : राज्यसभेनंतर (Rajysabha) विधान परिषदेच्या (Vidhanparishad) ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. तर २ जुलै ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. १६ जुलैच्या आधी ही मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आता विधानसभेचे संख्याबळ घटल्याने निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या मतांच्या कोट्यात घट झाली आहे. भाजपचा पाच जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असेल. शिंदे गट आणि अजित पवार गटही प्रत्येकी दोन जागांसाठी प्रयत्नशील आहेत. याचाच अर्थ महायुती (Mahayuti) ९ जागांसाठी प्रयत्न करण्याची शक्यता आहे.


काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे ११ जागांपैकी नऊ जागा जिंकण्यासाठी महायुतीने मोर्चेबांधणी आखण्यास सुरुवात केली आहे.


भौगोलिक, सामाजिक समीकरण निकषावरच उमेदवारी दिली जाणार आहे. संघटनेतील सक्रिय पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशकडे विधानपरिषदेची मागणी केली आहे. दरम्यान, या विधानपरिषदेच्या निवडणुकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता भाजप श्रेष्ठी विधानपरिषदेची माळ कोणाकोणाच्या गळ्यात टाकतात ते पाहावे लागेल.



विधानपरिषदेसाठी भाजपात ३५ इच्छुकांचे अर्ज


विधानपरिषदेची जागा मिळवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी पाहायला मिळत आहे. भाजप प्रदेशकडे आतापर्यंत ३५ जणांनी अर्ज केले आहेत. भाजपचे पाच उमेदवार निवडून येतील इतकी मते भाजपकडे आहेत, पण भाजपकडे आतापर्यंत ३५ इच्छुकांनी अर्ज केले आहेत. भाजप प्रदेशकडे आलेल्या अर्जांवर पुन्हा एकदा कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे.



कार्यकाल संपलेले आमदार कोणते?


मनीषा कायंदे (शिवसेना, शिंदे गट), भाई गिरकर (भाजप), निलय नाईक राष्ट्रवादी, (अजित पवार गट), बाबाजानी दुरानी (राष्ट्रवादी अजित पवार गट), अनिल परब (शिवसेना, ठाकरे गट), रमेश पाटील (भाजप), वजहत मिर्झा (काँग्रेस), रामराव पाटील (भाजप) , प्रज्ञा सावंत (काँग्रेस), महादेव जानकर (रासप), जयंत पाटील (शेकाप) या आमदार यांच्या जागा रिक्त होणार असल्याने ही निवडणूक होणार आहे.

Comments
Add Comment

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जुलैत तीन दिवसांच्या महाराजस्व मोहिमेचे आयोजन

२१ ते २३ जुलैदरम्यान ५० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3

International Yoga day : योग हे समाजाला जोडण्याचे माध्यम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त मत मुंबई (विशेष प्रतिनिधी ) योगचा

BMC : उत्कृष्ट शासकीय प्रकल्प निर्मितीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि देखरेख यांना महत्त्व

लिबर्टी उद्यान महानगरपालिका शालेय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे उद्गार मुंबई :

BMC News : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर उतारा

हिंदमाता, मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत टाकी बांधून ठाणे खाडीत सोडणार मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी मुंबई