Government Job : भरघोस पगाराची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात रिक्त पदांसाठी मेगाभरती

अर्ज कुठे अन् कसा कराल? जाणून घ्या सविस्तर


मुंबई : सध्या अनेक तरुण भरघोस पगारासह सरकारी नोकरीच्या (Government Job) शोधात असतात. अशाच तरुणांसाठी एक आनंदाची बातमी मिळत आहे. बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) आरोग्य विभागाच्या अंतर्गत मेगाभरती जाहीर केली आहे. वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठात असिस्टंट प्राध्यापक पदांसाठी एकूण १३९९ पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार बीपीएससीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करु शकणार आहेत. ही अर्जप्रक्रिया २५ जून ते २६ जुलै या कालावधीपर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.



वयोमर्यादा


BPSC च्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्गातील लोकांसाठी वयोमर्यादा ४५ वर्ष आहे. मागासवर्गीय गटातील (पुरुष आणि महिला) साठी ४८ वर्ष वयोमर्यादा आहे. तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या लोकांसाठी आणि बिहारच्या राज्य आरोग्य सेवा अंतर्गत कार्यरत डॉक्टरांसाठी ५० वर्ष वयोमर्यादा असणार आहे.



अर्ज करण्यासाठी शुल्क


या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी सामान्य प्रवर्ग, OBC आणि EWS श्रेणीसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD/ महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २२५ रुपये आहे.



वेतन


BPSC अंतर्गत पदांसाठी निवडलेल्या उमेदवाराला १५,६०० ते ३९,१०० रुपये पगार दिला जाईल, असे विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही