CM Eknath Shinde : लक्ष्मण हाकेंनी उपोषण थांबवल्यानंतर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

पंकजा मुंडे यांनीदेखील दिली प्रतिक्रया; नाव न घेता जरांगेंना लगावला टोला


मुंबई : मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीमधून आरक्षण देऊ नये याकरता ओबीसी समाज (OBC) पेटून उठला होता. यासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) व नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे ओबीसी नेते गेल्या दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. अखेर आज उपोषणाच्या दहाव्या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर हे उपोषण स्थगित करण्यात आलं आहे. दरम्यान, हे उपोषण आम्ही तात्पुरतं मागे घेतलं असून आमचा लढा सुरु राहणारच आहे, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ''काल ओबीसी शिष्टमंडळासोबत आमची बैठक झाली. बैठकीत उपमुख्यमंत्री, इतर मंत्री सगळे होते. यावेळी चांगली चर्चा झाली. कुठल्याही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा, ओबीसी समाज आणि कोणावरही अन्याय होऊ नये, यावर आमची चर्चा झाली.''


पुढे ते म्हणाले, ''या बैठकीत अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यात काही मुद्द्यांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं ठरलं आहे. यातच आज त्यांनी (लक्ष्मण हाके) शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो.''



पंकजा मुंडे यांनीही दिली प्रतिक्रिया


पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना मी भेटले होते. त्यांच्या तब्बेतेची चौकशी मी वेळोवेळी करत होते. काल आमची बैठक झाली. बैठकीत आम्ही आमचे विचार मांडले. शिष्टमंडळाला आज पाठवण्यात आलं. चांगली गोष्ट आहे की, सरकारने दखल घेतली. सरकारकडून सकारात्मक निर्णय येईल. या विषयाने आंदोलन स्थगित केलं असेल.''


पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''त्यांच्या मागण्या न्याय आहेत.'' मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता त्या म्हणाल्या की, ''लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांच्या उपोषणात मला आदर आहे. त्यांची भाषा विचार यात त्यांनी कोणाला ललकारले नाही. त्यांच्या वागण्या बोलण्यातून एक आदर वाटतो. बाकी कोण काय बोलतो यावर बोलायची गरज नाही.''

Comments
Add Comment

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि