Heat Wave : मृत्यूचे तांडव! माणसांसह पक्षीही ठरले उष्माघाताचे बळी

नवी दिल्ली : देशातील काही राज्यात पावसाचे (Monsoon) आगमन झाले आहे. मात्र अजूनही काही भागात नागरिकांना उन्हाच्या कडाक्याचा (Heat Wave) सामना करावा लागत आहे. जून महिन्याचा अखेर जवळ आला तरीही यंदा ऋतु चक्रात बदल झाल्याने पावसाची हवी तशी हजेरी लागल्याचे दिसून येत नाही. याचा फटका मानवी आयुष्यासह बऱ्याच पक्ष्यांना बसत आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने निशाचर असलेले वटवाघूळ पक्षी जैविक साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. परंतु तीव्र उष्णतेमुळे कानपूर येथे मोठ्या प्रमाणात वटवाघूळ मृत अवस्थेत आढळून आले आहेत. तर दिल्लीतही २४ तासांत २२ जण उष्माघाताचे बळी ठरल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे.



उष्णतेने वटवाघुळांचा झपाट्याने मृत्यू


उत्तर भारतात मैदानी पट्टा असल्याने मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट जाणवते. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा केले होते. मात्र या उष्णतेच्या लाटेचा सामना नागरिकांसह पक्ष्यांनासुद्धा करावा लागला आहे. वाढत्या उष्णतेमुळे कानापुरातील नाना राव पार्कमध्ये उष्णतेचा तडाका सहन न झाल्याने वटवाघुळांचा मृत्यू झाला आहे. साधारण १०० हून अधिक वटवाघुळांची मृत शरीरे नाना राव पार्कमध्ये आढळून आली. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वटवाघुळांच्या शरीराचे अवशेष पडल्याने रोगराई पसरेल अशी चिंता स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.



दिल्लीत २४ तासांत २२ जणांचा मृत्यू


दिल्ली येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) आणि सफदरजंग या तीन रुग्णालयांत गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. सफदरजंग रुग्णालयात उष्णतेमुळे त्रस्त ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘एलएनजेपी’ या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १७ पैकी पाच रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. तर, ‘आरएमएल’ रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताचे २२ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिली.


दरम्यान, सततच्या बदलत्या ऋतु चक्राचा पर्यावरणावर होणारा परिणाम आणि धोक्यात येणारे मानवी जीवन असे बरेच प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाले आहेत. तर प्रशासनाने याबाबत काही हालचाल करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे.

Comments
Add Comment

स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अयोध्येचा विकास

लखनऊ / अयोध्या : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा परिणाम म्हणून अयोध्येचा स्मार्ट सिटी

विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपती, राज्यपालांवर वेळेचं बंधन नाही; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना राज्य किंवा केंद्र

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच जिल्हा परिषदांचा कार्यक्रम

आरक्षणासाठी निवडणूक आयोग पुन्हा लॉटरी काढण्याची शक्यता नवी दिल्ली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते

कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान! राज्यातील राजकारणावर चर्चांना उधाण

कर्नाटक: एकीकडे बिहारमध्ये आज नितीशकुमार यांनी दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर दुसरीकडे

शिक्षकांच्या मानसिक छळाला कंटाळून सांगलीच्या विद्यार्थ्याची मेट्रो स्टेशनवर उडी मारून आत्महत्या

दिल्ली : सांगली जिल्ह्यातील दहावीचा विद्यार्थी शौर्य प्रदीप पाटीलने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक छळाला