Nitish Kumar : नितीश कुमार यांनी आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय हायकोर्टाकडून रद्द

काय होता हा निर्णय?


पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्या सरकारने बिहारमध्ये वाढीव आरक्षणाचा घेतलेला निर्णय पाटणा हायकोर्टाने (Patna High Court) रद्द केला आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यावरुन ६५ टक्क्यांवर नेण्याचा निर्णय बिहार सरकारने (Bihar Government) घेतला होता, मात्र या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं होतं. आज यावर पाटणा कोर्टात पार पडलेल्या सुनावणीत हायकोर्टाने निर्णय रद्द केला.


नितीश कुमार यांनी जातीचं सर्वेक्षण केलं होतं. त्यावेळी ते राज्यात आरजेडी आणि काँग्रेससोबत महाआघाडीच्या सरकारसोबत होते. जात सर्वेक्षणाचं काम घाईघाईने करून त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतरच नितीश कुमार यांच्या सरकारने मागास, अतिमागास, एससी आणि एसटीचं आरक्षण ६५ टक्के करण्याचा आदेश जारी केला होता. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्के निश्चित केलेली, त्यामुळे नितीश सरकारचा हा निर्णय न्यायालयात टिकणार नसल्याचं त्याचवेळी स्पष्ट दिसत होतं. अशातच आता पाटणा हायकोर्टाने नितीश कुमार यांचा आरक्षण वाढवण्याचा आदेशही रद्द केला आहे.



नेमका निर्णय काय होता?


नितीश कुमार सरकारने एससी, एसटी, ईबीसी आणि इतर मागासवर्गीयांना (OBC) शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ६५ टक्के आरक्षण दिलं होतं. तर सरकारी सेवेत सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना केवळ ३५ टक्के पदेच देण्यात येत होती. ९ नोव्हेंबर २०२३ रोजी हा निर्णय घेण्यात आला होता. या प्रकरणात, गौरव कुमार आणि इतरांनी आरक्षणाला आव्हान देणारी याचिका दाखल केली, ज्यावर आज सुनावणी झाली. त्यानंतर याबाबतचा निर्णय ११ मार्च २०१४ पर्यंत राखून ठेवला होता, तो आज देण्यात आला.

Comments
Add Comment

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, रेल्वे वाहतूक विस्कळीत

मुंबई: मुंबई शहरात आणि उपनगरात मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता निर्माण

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

न्हावा शेवा बंदरावर आले पाकिस्तानी कंटेनर! DRI ची सर्वात मोठी कारवाई

न्हावा शेवा बंदरातून १२ कोटी रुपयांचे पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधने आणि सुके खजूर जप्त नवी मुंबई:  न्हावा शेवा

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून