Tea Price Hike : 'गरम चाय की प्याली' महागली!

चहाप्रेमींना द्यावे लागणार जास्तीचे पैसे; नेमके कारण काय?


मुंबई : सकाळचा वाफाळलेला चहा, हातात पेपर असे निवांत क्षण सर्वांनाच हवे असतात. आपापल्या परीने प्रत्येक जण कडक चहासोबत सकाळची सुरुवात करत असतो. भारतातील लोकांना चहा प्यायला आवडतो. चहाचे उत्पादन (Tea production) आणि वापर या दोन्ही बाबतीत भारत (India) हा अग्रगण्य देश आहे. चहा उत्पादक देशांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक तर चीन पहिल्या क्रमांकावर येतो. जगभरातील देशांमध्ये प्रसिद्ध आणि स्वस्त पेय असण्याव्यतिरिक्त, चहा लोकांच्या जीवनात इतका एकरूप झाला आहे की त्याला वेगळे करणे अशक्य आहे. मात्र यंदा चहा महागल्याने (Tea Price Hike) प्रत्येक घोटासोबत लागणारे चटके अधिक तीव्र झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठया प्रमाणात आहे. परंतु यंदा चहा पिणेही खिशाला जड जाणार असल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतीय चहा उद्योगाला प्रतिकूल हवामानामुळे चालू पीक वर्षाच्या जूनपर्यंत सहा कोटी किलोग्रॅम उत्पादनाची कमतरता भासत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यावेळी देशातील चहाचे उत्पादन कमी झाल्याचे माहिती मिळत आहे. त्यामुळे चहाचे कमी होणारे उत्पादन उत्पादकांच्या महसुलावर परिणाम करेल आणि चहाच्या किमती आणखी वाढतील, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.



सूर्यप्रकाशाचा अभावामुळे उत्पादनात घट


उत्तर भारतीय चहा उद्योगात गुंतलेली आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये धोकादायक परिस्थितीला तोंड देत आहेत. मे महिन्यातील अतिउष्णता आणि पावसाचा अभाव, अतिवृष्टी आणि सूर्यप्रकाशाचा अभाव यामुळे चहाच्या उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे.



चहाचे उत्पादन ६ कोटी किलोने कमी


टी असोसिएशन ऑफ इंडियाचे (ΤΑΙ) अध्यक्ष संदीप सिंघानिया यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, जूनपर्यंत चहा पिकाचे एकत्रित नुकसान गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा कोटी किलोग्रॅम असू शकते.



'इतक्या' टक्क्यांनी उत्पादन कमी झाल्याचा अंदाज


टी बोर्ड ऑफ इंडियाने काढलेल्या आकडेवारीवरून, एप्रिल २०२४ पर्यंत आसाममध्ये चहाचे उत्पादन सुमारे ८ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये १३ टक्क्यांनी घटले आहे. त्याचबरोबर आसाममधील चहांच्या बागांमध्ये मे महिन्यातील उत्पादन २० टक्के तर पश्चिम बंगालमधील ४० टक्क्यांनी कमी झाल्याचा अंदाज आहे.

Comments
Add Comment

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू

India Iran Relations : खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराला परराष्ट्र राज्यमंत्री आणि बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

नवी दिल्ली : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनेई यांच्या राजकीय अंत्यसंस्कार सोहळ्यात

Rajya Sabha : राज्यसभेच्या आठ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन(CP Radhkrushna) यांनी सोमवारी राज्यसभेच्या सात नवनिर्वाचित आणि

Presidential Award : ऑपरेशन सिंदूर”सह विविध मोहिमांतील वीरांना सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित संरक्षण अलंकरण समारंभात

Dada Bhuse : पुढीलवर्षीपासून 'टीईटी'सह सर्व परीक्षा ऑनलाइन

शिक्षण मंत्र्यांची घोषणा; पेपरफुटीनंतर खबरदारी, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती मुंबई : शिक्षक पात्रता