T20 World Cup 2024: भारताला बनायचे असेल चॅम्पियन तर करावी लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये पोहोचेपर्यंत कोणताही सामना हरलेला नाही. मात्र आता खरी परीक्षा सुरू होत आहे. यूएसएची पिच आतापर्यंत गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. याचा जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भरपूर फायदा उचलला. पाकिस्तान आणि यूएसएविरुद्धच्या सामन्यात एकवेळेस टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. यावरून संकेत होते की संघामध्ये काही कमकुवत बाबी जरूर आहेत


ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा फॉर्म पाहता भारतासाठी हा रस्ता काही सोपा नाही. भारत २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेला नाही.



विराट कोहलीने धावा काढाव्यात


विराट कोहली टी-२० वर्ल्डकपच्या सुरूवातीपासून रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका निभावत आहे. त्याने आतापर्यंतच्या ३ सामन्यात केवळ ९ बॉल क्रीझवर टिकून होता. यात त्याने केवळ ५ धावा केल्यात. कोहलीला भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. अशातच त्याने फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे.



टीममध्ये रिस्ट स्पिनर महत्त्वाचा


भारताच्या टी-२० वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या रूपात २ रिस्ट स्पिनर आहेत. मात्र अद्याप त्यांचा उपयोग करण्यात आलेला नाही. आता वर्ल्डकपचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहे. येथे पिच स्पिन गोलंदाजीसाठी अनुकूल ठरू शकते.



मधल्या फळीत सातत्य


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रूात भारताचे सलामीचे फलंदाज वर्ल्डकपमध्ये निष्फळ ठरले आहेत. दरम्यान तिसऱ्या स्थानावर खेळताना ऋषभ पंतने सर्व सामन्यात टिकून फलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी अपयशी ठरल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव येत आहे. अशातच सूर्यकुमारने एका अर्धशतकाशिवाय २ डावांत केवळ ९ धावा केल्या.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख