T20 World Cup 2024: भारताला बनायचे असेल चॅम्पियन तर करावी लागतील ही ३ कामे

मुंबई: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये(t-20 world cup 2024) सुपर ८मध्ये पोहोचेपर्यंत कोणताही सामना हरलेला नाही. मात्र आता खरी परीक्षा सुरू होत आहे. यूएसएची पिच आतापर्यंत गोलंदाजांना अनुकूल राहिली आहे. याचा जसप्रीत बुमराहसह इतर भारतीय वेगवान गोलंदाजांनी भरपूर फायदा उचलला. पाकिस्तान आणि यूएसएविरुद्धच्या सामन्यात एकवेळेस टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. यावरून संकेत होते की संघामध्ये काही कमकुवत बाबी जरूर आहेत


ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडचा फॉर्म पाहता भारतासाठी हा रस्ता काही सोपा नाही. भारत २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयसीसीची एकही स्पर्धा जिंकलेला नाही.



विराट कोहलीने धावा काढाव्यात


विराट कोहली टी-२० वर्ल्डकपच्या सुरूवातीपासून रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका निभावत आहे. त्याने आतापर्यंतच्या ३ सामन्यात केवळ ९ बॉल क्रीझवर टिकून होता. यात त्याने केवळ ५ धावा केल्यात. कोहलीला भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा मानला जातो. अशातच त्याने फॉर्ममध्ये येणे महत्त्वाचे आहे.



टीममध्ये रिस्ट स्पिनर महत्त्वाचा


भारताच्या टी-२० वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या रूपात २ रिस्ट स्पिनर आहेत. मात्र अद्याप त्यांचा उपयोग करण्यात आलेला नाही. आता वर्ल्डकपचे सर्व सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार आहे. येथे पिच स्पिन गोलंदाजीसाठी अनुकूल ठरू शकते.



मधल्या फळीत सातत्य


रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात रूात भारताचे सलामीचे फलंदाज वर्ल्डकपमध्ये निष्फळ ठरले आहेत. दरम्यान तिसऱ्या स्थानावर खेळताना ऋषभ पंतने सर्व सामन्यात टिकून फलंदाजी केली. मात्र सलामीची जोडी अपयशी ठरल्याने मधल्या फळीतील फलंदाजांवर दबाव येत आहे. अशातच सूर्यकुमारने एका अर्धशतकाशिवाय २ डावांत केवळ ९ धावा केल्या.

Comments
Add Comment

कांगारूंनी भारतीय महिलांचा उडवला धुव्वा!

होबार्ट : ऑस्ट्रेलियन महिला संघाने फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर भारतीय महिला संघाला पूर्णपणे

नागपूरच्या गनपावडर कारखान्यात स्फोट, १७ ठार

नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमधून होलिकोत्सवाच्या आदल्या दिवशी एक दुःखद बातमी आली आहे.

अमेरिका - इराण युद्धाचा वर्ल्डकपवर परिणाम, आयसीसीची यंत्रणा लागली कामाला

नवी दिल्ली : अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्तपणे हवाई हल्ले सुरू केले आहेत. या हल्ल्यांना इराणकडून

T20 World Cup 2026 Ind vs WI : दोन्ही संघासाठी करो वा मरोची लढत; जाणून घ्या Playing XI मध्ये कोणाकोणाची समावेश

टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून ग्रुप ए मधील फक्त दोन सामने बाकी आहेत. यामध्ये एक

क्रिकेटच्या 'थाला'ला हाऊसिंग बोर्डाची नोटीस; केवळ १५ दिवसांची मुदत

क्रिकेटचा थाला अशी ओळख असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला झारखंड राज्य गृहनिर्माण

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून