T-20 world cup 2024: सूर्याचे वादळ, बुमराहचा कहर,सुपर ८मध्ये भारताचा अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय

बार्बाडोस: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी हरवले. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. आधी सूर्यकुमार यादवने धावांचे वादळ आणले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याच्या जोरावर भारताला हा विजय साकारता आला.


सुपर ८मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना २२ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवला जाईल.


भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.


भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.


शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गोलंदाजीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट काढल्या. तर कुलदीप यादवला २ आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य