T-20 world cup 2024: सूर्याचे वादळ, बुमराहचा कहर,सुपर ८मध्ये भारताचा अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय

बार्बाडोस: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी हरवले. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. आधी सूर्यकुमार यादवने धावांचे वादळ आणले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याच्या जोरावर भारताला हा विजय साकारता आला.


सुपर ८मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना २२ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवला जाईल.


भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.


भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.


शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गोलंदाजीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट काढल्या. तर कुलदीप यादवला २ आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील