T-20 world cup 2024: सूर्याचे वादळ, बुमराहचा कहर,सुपर ८मध्ये भारताचा अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय

  114

बार्बाडोस: टी-२० वर्ल्डकप २०२४च्या सुपर ८मधील सामन्यात भारताने अफगाणिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. भारताने अफगाणिस्तानला ४७ धावांनी हरवले. या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोनही आघाड्यांवर चांगली कामगिरी केली.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल अफगाणिस्तानच्या संघाला केवळ १३४ धावा करता आल्या. आधी सूर्यकुमार यादवने धावांचे वादळ आणले. त्यानंतर गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने कहर केला. त्याच्या जोरावर भारताला हा विजय साकारता आला.


सुपर ८मध्ये दोन्ही संघांचा हा पहिला सामना होता. आता भारतीय संघ आपला पुढचा सामना २२ जूनला बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना अँटिग्वामध्ये खेळवला जाईल.


भारताला पहिल्या ११ धावांवर धक्का बसला तो रोहित शर्माच्या रूपाने. रोहितने केवळ ८ धावा केल्या. ऋषभ पंत मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच २० धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परला. त्यानंतर विराट कोहली स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच तोही बाद झाला.


भारताचे तीन विकेट झटपट पडल्यानंतर सूर्यकुमार यादवने शिवम दुबेच्या मदतीने खेळी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुबे १० धावा करून बाद झाला. त्यानंतर सूर्याने हार्दिकला हाताशी घेतले आणि धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने २८ बॉलमध्ये ५३ धावांची खेळी केली. तर हार्दिक पांड्या २४ बॉलमध्ये ३२ धावा करून बाद झाला.


शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताचे फलंदाज झटपट बाद होत गेले. त्यामुळे भारताचा डाव १८१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर गोलंदाजीतही भारताने जबरदस्त कामगिरी केली. अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी ३ विकेट काढल्या. तर कुलदीप यादवला २ आणि अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार