Road Potholes : पावसाळा सुरू झाला तरी सिमेंट रस्त्यांचे खड्डे कायम!

  57

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या तंबी नंतर आयुक्तांनी दिलेली डेडलाईन धुडकावली


भाईंदर : निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे, विस्कळीत झालेले जनजीवन, वाहन चालक आणि नागरिक यांचे होणारे हाल प्रत्यक्ष अनुभवले. त्यानंतर थेट आयुक्तांशी संपर्क साधून तंबी दिल्यानंतर सिमेंट रस्त्यांची कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करावे असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. मात्र डेड लाईन धुडकावत मीरा रोड येथे सिमेंट रस्त्यांचे खड्डे कायम असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

सिमेंट काँक्रिटचा रस्ता तयार करण्यासाठी दिलेल्या कार्य आदेशाची मुदत पुर्ण होऊन आठ महिने झाले तरी मीरा रोड येथील पूनम गार्डन रोडचे सिमेंट काँक्रिटी करणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. पावसाळा सुरू झाला तरी रस्त्यासाठी केलेला मोठा खड्डा तसाच पडून असल्याने तसेच पावसाळा सुरू झाल्याने त्यात पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे वाहने आणि नागरिकांना कठीण प्रवास करावा लागत आहे.


निवडणूक प्रचारासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील सर्व ठिकाणी रखडलेली सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची कामे,त्यामुळे नागरिकांना होणारा प्रचंड त्रास प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर त्यांनी आयुक्तांशी संपर्क साधून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आयुक्तांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी सिमेंट रस्त्यांची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करून नागरिकांना रहदारीसाठी पूर्ववत करून देण्याचे आदेश दिले होते. परंतु ठेकेदार,महापालिका अभियंते यांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले. त्यासोबत आयुक्तांनी दिलेली डेड लाईन उलटून २० दिवस झाले, तरीसुध्दा मीरा रोड येथील पुनम गार्डन रस्त्यावर सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी खणून ठेवलेला रस्त्या तसाच अर्धवट अवस्थेत पडून असल्याची तक्रार समाजसेवक नितीन नाईक यांनी आयुक्तांकडे केली असून नागरिकांना जीव मुठीत धरून जाण्यापासून मुक्तता देण्याची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी