Raosaheb Danve : 'जाऊ द्या घरी, वाजले की बारा' हे उद्धव ठाकरेंचे धंदे!

  110

तेच तेच मुद्दे असलेल्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोकही कंटाळले


रावसाहेब दानवेंनी उपसलं टीकास्त्र


मुंबई : शिवसेना वर्धापन दिन काल ठाकरे गटाने (Thackeray Group) आयोजित केलेल्या समारंभात उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सत्ताधाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या या टीकांमुळे भाजपा नेत्यांनीही आपले टीकास्त्र उपसले आहे. भाजपा नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी उद्धव ठाकरेंची भाषणं ही धोरणात्मक नसून करमणूक करणारी भाषणं झाली आहेत, अशी जळजळीत टीका केली. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे फारसं लक्ष द्यायची गरज नाही असा टोला भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे.


रावसाहेब दानवे म्हणाले, जाऊ द्या घरी, वाजले की बारा हे धंदे उद्धव ठाकरेंनी केले आहेत. ते राहून राहून डोक्यात येते. आता त्याला शब्दाची जोड देऊन करमणूक करण्याचं काम ते करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी भाषणात पुढची दिशा आणि विजय यावर भाष्य करायला हवं होतं. परंतु ते न करता नेहमीप्रमाणे शिवराळ भाषा वापरून मोदींवर टीका केली. ते एका नशेत आहेत. प्रत्येक भाषणात तोच तोच मुद्दा मांडतात. त्याला लोकही कंटाळलेत. जर त्यांना स्वत:ला वाटत असेल आम्ही सत्तेत येऊ तर आल्यानंतर काय करणार हे म्हणणं ठीक आहे. ब्रँड संपला ब्रँडी आली ही भाषा त्यांच्यासाठीच योग्य आहे. देशातील जनतेचा मोदींवर विश्वास आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेत असंही त्यांनी सांगितलं.


तसेच उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री असताना केवळ दोनदा मंत्रालयात आले, ते शरद पवारांनी पुस्तकात मांडलं आहे. उद्धव ठाकरेंनी कधीही राज्याचं व्हिजन भाषणात मांडलं नाही आणि आताही मांडत नाहीत. मोदी देशाला २०४७ पर्यंतचं व्हिजन देतायेत. उद्धव ठाकरेंचं भाषण १० मिनिटांत संपतं, आता हिंदू बांधवांनो म्हणतही नाहीत. उद्धव ठाकरेंनी फार तीर मारला नाही. ९ जागा निवडून आणल्यात. शरद पवारांच्या ८ जागा निवडून आल्यात. नरेंद्र मोदींच्या २४० जागा निवडून आल्यात. २४० जागा निवडून आणणारा नेता एका बाजूला आणि ९ जागा निवडून आणणारा नेता चॅलेंज करतो अशी दानवेंनी उद्धव ठाकरेंची खिल्लीही उडवली.



महायुती राज्याची सत्ता पुन्हा मिळवेल


दरम्यान, उद्धव ठाकरेंची भाषणं टीका केल्याशिवाय होत नाहीत. माझ्यावर टीका करतात. शरद पवारांच्या घराबाहेर उभे असलेले उद्धव ठाकरे मी पाहिलेत. धोरणात्मक विषयावर बोलतच नाही. टीकेशिवाय काय केले असा सवालही रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरेंना केला. याउलट महायुतीत जागावाटपाचा वाद नाही. तिन्ही पक्षाचे नेते समजदार आहेत, या राज्याची सत्ता आम्ही पुन्हा मिळवू असंही दानवेंनी म्हटलं.

Comments
Add Comment

आषाढीनिमित्त मध्य रेल्वे तीन एकेरी विशेष गाड्या चालवणार

मुंबई (प्रतिनिधी): पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी निमित्त सहभागी होणाऱ्या यात्रेकरूंच्या सोयीसाठी मध्य

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यातील काही भागात आजपासून चार दिवस जोरदार पाऊस बरसणार असल्याचं भारतीय हवामान खात्याच्या मुंबई

राज्यात यापुढे पायाभूत सोयी सुविधेचा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करावा – मुख्यमंत्री

बोरिवली ते ठाणे दुहेरी बोगदा प्रकल्पाचा घेतला आढावा मुंबई : राज्यात यापुढे कुठलाही पायाभूत सोयी सुविधेचा

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Pratap Sarnaik : वाहतूक व्यवसायकांना फायदा होणार ! ई-चलन समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापन करावी, परिवहन मंत्र्यांचे आदेश...

मुंबई : गेले अनेक वर्षापासून वाहतूक व्यावसायकांना ई-चलन संदर्भात अडचणींचा सामना करावा लागतोय, ही बाब सरकारच्या

हिंदी सक्ती विरोधात चढाओढ! ठाकरेंचे मोर्चे मराठीसाठी की राजकीय शक्ती दाखवण्यासाठी?

मुंबई : एक मुद्दा… पण दोन मोर्चे! आणि दोघंही 'ठाकरे'. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र येतील, असं काही