तामिळनाडूमध्ये विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू, ६० रुग्णालयात दाखल

चेन्नई: तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६०हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कल्लाकुरिची जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे. कल्लाकुरिचीच्या जिल्हा कलेक्टर एमएस प्रशांत यांनी जिल्ह्याच्या सरकारी मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची भेट घेतली.


या प्रकरणी ४९ वर्षीय अवैध दारू विक्रेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल २०० लीटर अवैध दारू जप्त करण्यात आली. यावेळी तपास केला असता त्यात घातक मेथनॉल होते.


मुख्यमंत्री एमके स्टालिन या मृत्यूप्रकरणी दु:ख व्यक्त केले. तसेच हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आल्याचे सांगितले.


स्टालिन यांनी एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की कल्लाकुरिचीमध्ये भेसळयुक्त दारू पिणाऱ्या लोकांच्या मृत्यूचाी बातमी ऐकून मी स्तब्ध आणि दु:खी झालो. याप्रकऱणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. हे रोखण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्याविरोधातही कारवाई कऱण्यात आली आहे. जर लोकांनी अशा गुन्ह्यांमध्ये सामील लोकांबाबत माहिती दिली तर तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Comments
Add Comment

Day Care Center Viral Video : डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांवरील अत्याचाराचा आरोप; व्हायरल व्हिडिओनंतर ५ जणांवर गुन्हा दाखल

बंगळुरूमधील धक्कादायक घटना, डेकेअर सेंटरमध्ये चिमुकल्यांना बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल  बंगळुरू :

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.