Ganesh idol : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडूच्याच गणेशमूर्ती बनवा

केडीएमसीच्या पर्यावरण प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे प्रतिपादन


कल्याण : यावर्षी संपन्न होणाऱ्या गणेशोत्सवासाठी मूर्तीकरांनी केवळ शाडूच्याच श्रीगणेशमूर्ती (Ganesh idol) तयार कराव्यात असे स्पष्ट प्रतिपादन महापालिकेच्या पर्यावरण प्रदूषण (Environment Pollution) नियंत्रण विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांनी केले. केंद्रीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, दिल्ली यांच्याकडील सुधारित मार्गदर्शक सूचनेनुसार प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती (Plaster of Paris) उत्पादनावर बंदी घालण्यात आलेली आहे, या पार्श्वभूमीवर कल्याणच्या आचार्य अत्रे रंग मंदिरात कारखानदार व मूर्ती विक्रेते यांचे समवेत पार पडलेल्या बैठकीत उपायुक्त अतुल पाटील यांनी हे स्पष्ट प्रतिपादन केले.


कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात मूर्ती बनवणारे कारागीर, मूर्तिकार व उत्पादक यांना पीओपी पासून मूर्ती तयार करण्यावर बंदी घालण्याचे आवाहन यापूर्वीही महापालिकेमार्फत करण्यात आले होते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका कार्यक्षेत्रात केवळ पर्यावरण मूर्तींचे उत्पादन व विक्री करण्यास मान्यता देण्याबाबत कळविले असल्याची असल्याची माहिती या बैठकीत उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.


या बैठकीत उपस्थित कारागीर/ मूर्तिकारांना त्यांनी केवळ पर्यावरणपूरक मातीच्या व नैसर्गिक रंग वापरून पाण्यात सहज विरघळणाऱ्या मातीच्या मूर्तींची निर्मिती व विक्री करणे बाबत सक्त सूचना देण्यात आल्या. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनानुसार महापालिका क्षेत्रात मूर्ती बनविणे अथवा विक्री करण्यासाठी महानगरपालिकेकडे नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणी न केलेले कारागीर मूर्तिकार व उत्पादक यांना महानगरपालिका क्षेत्रात मूर्ती विक्री स्टॉलला महापालिकेमार्फत परवानगी देण्यात येणार नाही असेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.


प्रत्येक प्रभागात उपलब्ध असलेल्या जागेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार केवळ पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना आवश्यक पुरेशी शाडू माती आणि जागा उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन उपायुक्त अतुल पाटील यांनी या बैठकीत दिले. या बैठकीस उपस्थित असलेले कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे, पर्यावरण कार्यकर्ता रोहित जोशी, मनूसृष्टी पर्यावरण कन्सल्टन्सीच्या वैशाली तांबट यांनी पीओपीच्या मूर्तीमुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या हानी बाबतची, जलप्रदूषणाबाबतची माहिती उपस्थितांसमोर सादर केली.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात