Price Hike : मासळीचे दर दामदुप्पट, तर चिकनचीही तीनशेकडे वाटचाल

रत्नागिरी : समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे, सध्या खाडीच्या माशांना मागणी वाढली आहे; पण अपेक्षित मासे नसल्याने दर वधारले आहेत. दोनशे ते तीनशे रुपयांना मिळणारे खेकडे सहाशेवर तर पावसात मिळणारे काकई, तिसरे, लेपी, सुळे, कांटा, ताऊज यांसारखी मासळीही पाचशे ते सहाशे रुपये किलोने विकली जात आहे. मासे खवय्यांची पंचाईत झाली असून, अनेक जण चिकनकडे वळू लागले आहेत. तिथेही किलोचा दर नेट २८० ते २९० रुपयांवर पोहोचला आहे.


१ जूनपासून समुद्रातील मासेमारी बंद करण्यात आली. त्यानंतर खाडीमध्ये मासेमारीला सुरुवात झाली. पावसाला किनारी भागात येणारे मासेही सापडू लागले आहेत. या माशांचे प्रमाणे कमी असल्याने, खवय्यांची पंचाईत झाली आहे. रत्नागिरी शहराजवळील राजीवडा आणि मिरकरवाडा बंदरावर माशांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात होते. हंगामामध्ये ताजे मासे खरेदीसाठी अनेक जण सकाळी व सायंकाळी तिथे हजेरी लावतात.


रविवारी या ठिकाणी मासे खरेदीसाठी गेलेल्या खवय्यांना माशांचे दर चांगलेच वधारलेले पाहायला मिळाले. मासे खरेदी करताना, अनेकांच्या खिशाला चाट बसली. मोठा खेकडा ६०० रुपयाला एक या प्रमाणे विकला जात होता. तिसरे किंवा मुळे १५० रुपये शेर होते. ते शंभर रुपयांनी विकले जातात. पावसाळ्यात मिळणारा ताऊज मासा खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडते. याला २५० ते ३०० रुपये अर्धा किलो दर आहे. किलोला ५०० ते ६०० रुपये आकारले जात आहेत.


बोयरं, रेणवी हे मासेही याच दराने विकण्यात येत आहेत. लेपी, सुळे, कांटा, खाडीची कोळंबी यांसारखी मासळी विक्रीला ठेवण्यात आली होती. त्याचेही दर वधारलेले आहेत. त्यामुळे सध्या चिकन, मटणाला मोठी मागणी आहे. काही जण मासे आणून, त्यावर इच्छा भागवून घेतात. पण माशांचे दर पाहून काहींचा कल चिकन खरेदीकडेच वाढला आहे. मात्र चिकनचे दरही तीनशे रुपयांचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहेत.

Comments
Add Comment

कोकणासाठी सोनेरी दिवस; महाराष्ट्र सरकार उभारणार वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्ग

मंत्री नितेश राणेंनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार; सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण

Game Changer Decision.... वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गाला हिरवा कंदील, कोकणच्या विकासाची दारं उघडणार!'

आंबा, काजू, मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार; तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध होईल – मंत्री नितेश राणे नागपूर:

Breaking News ! पालिका निवडणुकीसाठी युतीचा फॉर्म्युला ठरणार? भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री ९ वाजता महत्त्वपूर्ण बैठक

नागपूर : राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या

मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी आता लोकायुक्तांच्या चौकशीकक्षेत

महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक २०२५ विधानसभेत मंजूर नागपूर : महाराष्ट्रातील भ्रष्टाचार विरोधी यंत्रणेला

पुणे आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनींना वारंवार करावी लागते 'प्रेग्नन्सी टेस्ट'; आमदारांनी उपस्थित केला गंभीर प्रश्न

नागपूर : पुणे जिल्ह्यातील आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये विद्यार्थिनींना सुट्टीवरून परतल्यानंतर वारंवार

मुंबईकरांसाठी मोठी भेट, ओसी नसलेल्या २० हजार इमारतींना मिळणार दिलासा

दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना फायदा सुधारीत भोगवटा अभय योजनेची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून