Rice Farming : बळीराजा सुखावला! लहरी पावसातही भाताचे राब पूर्ण

  52

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची ओढ


कर्जत : कर्जत (Karjat) तालुक्यात भाताची शेती (Rice farming) खरीप प्रामुख्याने केली जाते. गेल्या अनेक दशकांचा अंदाज पाहता, मान्सूनची सुरुवात ७ जून रोजी होत असते. त्यानुसार भाताचे राब शेतकरी वर्ग तयार करण्यास घेत असतो. त्यानुसार कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली राब पेरणीची कामे पूर्ण केली आहे. तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाताची पेरणी केली असल्याची माहिती कर्जत तालुका कृषी विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान भाताचे बियाणे जमिनीच्यावर आले असून, अनेक ठिकाणी भाताच्या राबामुळे शेतातील काही भाग हिरवागार दिसू लागला आहे.


भाताच्या शेतीचे कोठार म्हणून कधी काळी कर्जत तालुका ओळखला जात होता. त्यात १९८०च्या दशकात कर्जत तालुक्यात फार्महाऊस सुरू झाले आणि कर्जत तालुक्यातील भाताचे क्षेत्र कमी झाले, तरीदेखील कर्जत तालुक्यात खरीप हंगामात साधारण दहा हजार हेक्टरवर भाताची शेती केली जाते. उन्हळ्यात रगबी हंगामात देखील किमान दोन हजार हेक्टर जमिनीवर भाताची दुबार शेती केली जाते. मात्र शेतकरी वर्ग मे महिन्याच्या अखेरीस भाताची मशागत सुरू करीत असतो. त्यानुसार पहिल्या पावसाची शक्यता लक्षात घेऊन, ५ जूनपासून शेतकऱ्यांनी भाताचे बियाणे यांची पेरणी सुरू केली होती. त्यानुसार भाताचे राब भरणी करण्याचे काम कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण केले आहे. भाताच्या राबासाठी लागणारे पावसाचे पाणी काही दिवस सुरू आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आलेल्या भाताच्या बियाणांचे उगवणे प्रक्रिया सुरू असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बळीराजा खूश असल्याचे दिसून येत आहे.


कर्जत खरेदी विक्री संघ, कर्जत भात संशोधन केंद्र आदी ठिकाणी भात बियाणे यांची विक्री सुरू होती. त्याचवेळी कृषी औषध विक्रेते यांच्याकडे देखील भाताचे बियाणे उपलब्ध होते, तर काही शेतकरी हे आपल्या शेतामधील भाताच्या पिकातील भातदेखील बियाणे म्हणून ठेवून देत असतात. आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांनी राब भरणी करून घेतली असून, पेरण्यांसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने, शेतीची कामे वेळेत पूर्ण झाली आहेत. त्यात अनेक भागांत भाताच्या बियाणे यांनी जमिनीच्यावर डोके काढले आहे. आपल्या शेतात भाताचे रोप आलेले पाहून, बळीराजा देखील खूश झाला असल्याचे दिसून येत आहे. समाधानकारक पाऊस यामुळे बळीराजा समाधानी असून, आता भाताचे बियाणे यांनी देखील जीव घेतला असल्याने शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची ओढ लागली आहे.भाताच्या रोपांसाठी पाऊस झाला आहे. आता भाताच्या चांगल्या रोपांसाठी चांगल्या पावसाची गरज असून, शेतकऱ्यांना आता चांगल्या पावसाची ओढ लागली आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’