Summer Special Trains : मध्य रेल्वे यंदा ९२० उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

१०.८९ लाख प्रवाशांना लाभ


मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी, नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त, उन्हाळी विशेष गाड्याही चालवत आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षी ९२० उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन केले असून त्याचा लाभ सुमारे १०.८९ लाख प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे. या विशेष गाड्या ज्यात पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीम नगर, मऊ, आगरतळा, आसनसोल, थिविम, कोचुवेली आणि इतर ठिकाणे या गाड्या धावल्या.


नियोजित ९२० उन्हाळी विशेष गाड्यांपैकी ३५३ ट्रेन सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहारसाठी, ८४ सेवा गोव्यासाठी, ३६ सेवा ईशान्येसाठी, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थान गंतव्यस्थानांसाठी आहेत. वरील राज्यांतून उन्हाळ्यातील प्रवासाची गर्दी लक्षात घेऊन , देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त ट्रेन्सचे नियोजन आणि चालवणे ही एक सतत प्रक्रिया आहे. विशिष्ट मार्गावर धावणाऱ्या गाड्या आणि या आवश्यकतेच्या आधारे, गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची संख्या वाढविली जाते. याशिवाय उन्हाळ्यात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे सक्रियपणे विविध उपाययोजना करत आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, नागपूर इत्यादी प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या टीमसह गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन प्रवाशांच्या योग्य मार्गदर्शनासाठी अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची तरतूद केली गेली.

Comments
Add Comment

उबाठाच्या त्या माजी ज्येष्ठ नगरसेवकांना बसावे लागणार घरी

मुंबई (खास प्रतिनिधी) : आगामी मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत उबाठाने आता तरुणांना आणि नवीन चेहऱ्यांनाच

महापालिकेच्या शीव रुग्णालयात अस्थिमज्जा प्रत्यारोपण सुविधा क्षमतेत ४०० टक्क्यांनी वाढ

तब्बल १२० प्रत्यारोपण केले जाणार मुंबई (खास प्रतिनिधी) : शीव (सायन) येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण

महाराष्ट्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

महाराष्ट्र सागरी मंडळाचे २६० कोटींचे सामंजस्य करार

हरित बंदर विकास विषयी डेन्मार्कच्या कंपनीसोबत मंत्री नितेश राणे यांची सविस्तर चर्चा मुंबई : नेस्को गोरेगाव