Summer Special Trains : मध्य रेल्वे यंदा ९२० उन्हाळी विशेष गाड्या चालवणार

१०.८९ लाख प्रवाशांना लाभ


मुंबई : मध्य रेल्वे (Central Railway) प्रवाशांच्या सोयीसाठी, नेहमीच्या गाड्यांव्यतिरिक्त, उन्हाळी विशेष गाड्याही चालवत आहे. मध्य रेल्वेने यंदाच्या वर्षी ९२० उन्हाळी विशेष गाड्यांचे नियोजन केले असून त्याचा लाभ सुमारे १०.८९ लाख प्रवाशांना होण्याची अपेक्षा आहे. या विशेष गाड्या ज्यात पूर्ण वातानुकूलित विशेष, अनारक्षित विशेष आणि वातानुकूलित, शयनयान आणि सामान्य द्वितीय श्रेणीच्या डब्यांचा समावेश आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, पनवेल, नागपूर, पुणे आणि सोलापूर येथून दानापूर, गोरखपूर, वाराणसी, बनारस, प्रयागराज, समस्तीपूर, करीम नगर, मऊ, आगरतळा, आसनसोल, थिविम, कोचुवेली आणि इतर ठिकाणे या गाड्या धावल्या.


नियोजित ९२० उन्हाळी विशेष गाड्यांपैकी ३५३ ट्रेन सेवा उत्तर प्रदेशसाठी, त्यानंतर २०५ सेवा बिहारसाठी, ८४ सेवा गोव्यासाठी, ३६ सेवा ईशान्येसाठी, ७४ सेवा महाराष्ट्रात आणि १६८ सेवा केरळ, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओरिसा व राजस्थान गंतव्यस्थानांसाठी आहेत. वरील राज्यांतून उन्हाळ्यातील प्रवासाची गर्दी लक्षात घेऊन , देशभरातील प्रमुख स्थळांना जोडण्यासाठी या अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. अतिरिक्त ट्रेन्सचे नियोजन आणि चालवणे ही एक सतत प्रक्रिया आहे. विशिष्ट मार्गावर धावणाऱ्या गाड्या आणि या आवश्यकतेच्या आधारे, गाड्यांची संख्या आणि फेऱ्यांची संख्या वाढविली जाते. याशिवाय उन्हाळ्यात प्रवाशांना आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मध्य रेल्वे सक्रियपणे विविध उपाययोजना करत आहे.


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, सोलापूर, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, नागपूर इत्यादी प्रमुख स्थानकांवर तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या टीमसह गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन प्रवाशांच्या योग्य मार्गदर्शनासाठी अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची तरतूद केली गेली.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती