Water Crisis : दिल्लीत पाणीबाणी! पाण्यासाठी नागरिकांची झुंबड

  64

नवी दिल्ली : महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असली तरीही देशातील अनेक राज्यातील नागरिकांना अजूनही उष्णतेच्या लाटा (Heat Wave) सोसाव्या लागत आहेत. एकीकडे प्रचंड उकाड्यामुळे काहिली होत असताना दुसरीकडे भीषण पाणीटंचाईला (Water shortage) सामोरे जावे लागत आहे. देशाची राजधानी दिल्ली येथेही नागरिकांना अशा दुहेरी संकटांचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सध्या दिल्लीतील गीता कॉलनी, वसंत विहार, ओखला अशा अनेक भागात तीव्र पाणीटंचाई आहे. या भागातील जलसंकटामुळे स्थानिक नागरिक चिंतेत पडले आहेत. या विभागात टँकर आल्याची माहिती मिळताच नागरिकांच्या पाण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येते. दिल्लीतील स्थानिक लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचप्रमाणे वसंत विहार परिसरातील कुसुमपूर पहाडी येथील लोकांनाही पाणी संकटाचा सामना करावा लागत असून ते टँकरवर अवलंबून दिवस काढत आहेत.


दरम्यान, पाणीटंचाई क्षेत्राजवळ टँकर येताच नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडत आहे. पाऊस पडल्यानंतर पाणीटंचाईची परिस्थिती सुधारु शकते असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे उन्हामुळे हैराण झालेले नागरिक पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

अभिनेता सलमान खानने घेतली राजनाथ सिंह यांची भेट

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानने आज, रविवारी दिल्लीत लखनौचे खासदार आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट

आसारामला मोठा झटका! हायकोर्टाने अंतरिम जामीन नाकारला, ३० ऑगस्टपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आदेश

नवी दिल्ली: अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूच्या अडचणी

एकाच पाषाणात १९० टन वजनाची गणेशमूर्ती

कोईम्बतूर : दक्षिण भारतातील ‘मँचेस्टर’ म्हणून ओळखले जाणारे कोईम्बतूर शहर अद्वितीय गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध

रशियाकडून तेल खरेदी करत भारताने रोखले जागतिक संकट, अहवालात मोठा खुलासा

नवी दिल्ली: रशियाकडून भारत तेल खेरदी करत असल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्या विरोधात

दहशतवादी संघटनांना मदत करणारा समंदर चाचा उर्फ '​​Human GPS' चकमकीत ठार, भारतीय सुरक्षा दलाला मोठं यश

जम्मू आणि काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश आलं आहे. दहशतवादी

जम्मू-काश्मीर: रामबनमध्ये ढगफुटीमुळे हाहाकार; तीन ठार, पाच बेपत्ता

जम्मू-काश्मीर: जम्मू आणि काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात ढगफुटीसदृश पाऊस आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे.