NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण


नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्यामुळे परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोवीस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी नितीन विजय यांनी याचिकेत केली होती.


यापूर्वीही नीट परिक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. आज पुन्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परिक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आज पुन्हा उर्वरित दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Vaishno Devi Yatra : हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे अमरनाथ आणि माता वैष्णो देवी यात्रा स्थगित

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या तीव्र हवामानाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून

Meerut Husband Murder Case : विषारी साप आणि प्रेमाचा आव! प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट

20 लाखांच्या विम्यासाठी पतीच्या हत्येचा कट; पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा, तपासात धक्कादायक दावा मुंबई : उत्तर

Kailash Mansarovar Yatra : मुसळधार पावसामुळे कैलास मानसरोवर यात्रा मार्ग दुसऱ्या दिवशीही बंद; २०० हून अधिक प्रवासी अडकले

नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक

Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाकडून 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' शब्दावर आक्षेप, अपघातग्रस्ताच्या कुटुंबाला ८ लाखांची नुकसान भरपाई

नवी दिल्ली : रेल्वे अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 'दुय्यम श्रेणीचा प्रवासी' या शब्दप्रयोगावर आक्षेप घेत

Krishna Temple : श्रीकृष्ण चरणी भक्ताने अर्पण केली २० लाखांची सोन्याची बासरी

राजस्थान : राजस्थानात चित्तोडगड जिल्ह्यातील मेवाडचे प्रसिद्ध श्री सावळिया सेठ मंदिरात जयपूर येथील एका भाविक