NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण


नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्यामुळे परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोवीस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी नितीन विजय यांनी याचिकेत केली होती.


यापूर्वीही नीट परिक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. आज पुन्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परिक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आज पुन्हा उर्वरित दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Dadar-Ratnagiri passenger : दादर–रत्नागिरी पॅसेंजर रेल पुन्हा दादर स्थानकापर्यंत करा; खासदार रविंद्र वायकर यांची मागणी

- शक्य असल्यास ही रेल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत विस्तारित करा - रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरातील चेंगराचेंगरी प्रकरणी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नालंदा: बिहारमधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली. या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला असून आठ जण जखमी झाले आहेत.

Bihar Stampede: बिहारच्या शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ जणांचा मृत्यू, ८ जण जखमी

मुंबई: बिहारमधील नालंदा येथे एक मोठी घटना घडली आहे. शीतला मंदिरात चेंगराचेंगरी झाली आहे. या घटनेत आठ जणांचा

CCTV Certification Rules: १ एप्रिलपासून अनेक चिनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या विक्रीवर बंदी; ग्राहकांवर काय परिणाम होणार?

मुंबई: भारतातील सीसीटीव्ही बाजारपेठेत मोठे बदल होणार आहेत. भारत इंटरनेट-कनेक्टेड सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठीचे

नितीश यांच्या विधान परिषद सदस्यपदाच्या राजीनाम्यानंतर राजकीय खळबळ; कोण होणार मुख्यमंत्री?

नवी दिल्ली: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज विधान परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. यापूर्वी ते राज्यसभेवर

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक