NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

  90

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण


नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्यामुळे परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोवीस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी नितीन विजय यांनी याचिकेत केली होती.


यापूर्वीही नीट परिक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. आज पुन्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परिक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आज पुन्हा उर्वरित दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके