NEET Exam : नीट परीक्षा रद्द होणार? निकालाविरोधात याचिकेवर आज सुनावणी

विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण


नवी दिल्ली : काही दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या रिंगणात पडला आहे. यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना या परिक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नीट परीक्षेचा हा वाद सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला असून आज याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नीट परिक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना ७१८, ७१९ गुण मिळाल्यामुळे परिक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून नीट २०२४ परिक्षेचा निकाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याप्रकरणी मोशन एज्युकेशन कोचिंगचे सीईओ नितीन विजय यांनी याचिका दाखल केली होती. त्यामध्ये नीट २०२४ चा पेपर पुन्हा घ्यावा. जर परीक्षा पुन्हा घेतली गेली नाही, तर हा चोवीस लाख मुलांवर अन्याय होईल. भविष्यात आम्हाला पात्र डॉक्टर मिळू शकणार नाही, अशी मागणी नितीन विजय यांनी याचिकेत केली होती.


यापूर्वीही नीट परिक्षेबाबत दाखल झालेल्या वेगवेगळ्या दोन याचिकांवर कोर्टात सुनावणी पार पडली होती. मात्र त्यावेळी कोर्टाने सगळी परीक्षा पुन्हा घेण्यास नकार दिला. आज पुन्हा न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसव्हीएन भाटी यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन बेंचसमोर याप्रकरणी सुनावणी होणार आहे. यावर न्यायालय काय वेगळे निर्देश देते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


दरम्यान, सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणाऱ्या तीन याचिकांवर सुनावणी झाली (NEET Exam) होती. परिक्षेवरील आरोपांची SIT समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी ग्रेस मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल, असेही स्पष्ट केले होते. आज पुन्हा उर्वरित दोन याचिकांवर सुनावणी होणार आहे. यावेळी कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे, 

जीएसटी सुसूत्रीकरणावर काँग्रेसने केलेल्या टीकेला पंतप्रधान मोदींचे चोख प्रत्युत्तर, काय म्हणाले पहा...

नवी दिल्ली: आज संपूर्ण देश केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या जीएसटी सुसूत्रीकरणावर सकारात्मक चर्चा