Lok Sabha Election: राहुल गांधी देणार राजीनामा आणि वायनाडमधून निवडणूक लढवणार प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी घोषणा केली की राहुल गांधी(rahul gandhi) केरळची वायनाड लोकसभा सीट सोडून रायबरेली येथील खासदार राहतील. यासोबतच खरगे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वायनाड येथून निवडणूक लढवणार.


राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. दरम्यान, कायद्यान्वये त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. याबाबत सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राजीनामा देतील.


मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आजच्या बैठकीत हे ठरले की केरळच्या वायनाड मतदारसंघातून आता प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील. रायबरेलीच्या जागेशी गांधी कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे. रायबरेलीच्या लोकांचे आणि पक्षाचे म्हणणे आहे की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार रहावेत.


वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना प्रेम मिळाले आहे. मात्र कायदा याला परवानगी देत नाही. यामुळे वायनाड मतदारसंघातून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ते रायबरेलीतून खासदार असतील.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च