Lok Sabha Election: राहुल गांधी देणार राजीनामा आणि वायनाडमधून निवडणूक लढवणार प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची घोषणा

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी घोषणा केली की राहुल गांधी(rahul gandhi) केरळची वायनाड लोकसभा सीट सोडून रायबरेली येथील खासदार राहतील. यासोबतच खरगे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वायनाड येथून निवडणूक लढवणार.


राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. दरम्यान, कायद्यान्वये त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. याबाबत सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राजीनामा देतील.


मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आजच्या बैठकीत हे ठरले की केरळच्या वायनाड मतदारसंघातून आता प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील. रायबरेलीच्या जागेशी गांधी कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे. रायबरेलीच्या लोकांचे आणि पक्षाचे म्हणणे आहे की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार रहावेत.


वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना प्रेम मिळाले आहे. मात्र कायदा याला परवानगी देत नाही. यामुळे वायनाड मतदारसंघातून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ते रायबरेलीतून खासदार असतील.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा