नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी घोषणा केली की राहुल गांधी(rahul gandhi) केरळची वायनाड लोकसभा सीट सोडून रायबरेली येथील खासदार राहतील. यासोबतच खरगे यांनी मोठी घोषणा करताना सांगितले की काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वायनाड येथून निवडणूक लढवणार.
राहुल गांधींनी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये केरळच्या वायनाड आणि उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून विजय मिळवला होता. दरम्यान, कायद्यान्वये त्यांना एक जागा सोडावी लागणार होती. याबाबत सोमवारी मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेतली. या दरम्यान ते म्हणाले की राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून राजीनामा देतील.
मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आजच्या बैठकीत हे ठरले की केरळच्या वायनाड मतदारसंघातून आता प्रियंका गांधी वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवतील. रायबरेलीच्या जागेशी गांधी कुटुंबाचा अतिशय जवळचा संबंध आहे. रायबरेलीच्या लोकांचे आणि पक्षाचे म्हणणे आहे की राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून खासदार रहावेत.
वायनाड मतदारसंघातून राहुल गांधींना प्रेम मिळाले आहे. मात्र कायदा याला परवानगी देत नाही. यामुळे वायनाड मतदारसंघातून त्यांना राजीनामा द्यावा लागेल. ते रायबरेलीतून खासदार असतील.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…