Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

  100

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न झाल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या झोपेवरही परिणाम होत आहे.


अनेक लोक असे आहेत ज्यांना बेडवर पडल्यानंतरही झोप येत नाही. जर झोप आलीच तरी सतत जाग येत असते. यामुळे सकाळी उठल्यावर त्यांना एनर्जेटिक वाटत नाही.


झोपेची समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. अशीच एक पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की रात्री झोपण्याआधी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गाढ झोप येते.


असे म्हटले जात आहे की सलग २१ दिवसांपर्यंत रात्री झोपण्याआधी लसूण खाल्ल्याने चांगल्या झोपेसोबत शरीरास अनेक फायदे मिळतात.


आरोग्य तज्ञांच्या मते लसूण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला आज लसूण खाण्याच्या फायद्याबद्दल सांगत आहोत.


लसणीमध्ये एलीसिन नावाचे एजंट असते जे नियमितपणे खाल्ल्याने प्रत्येक प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षा मिळते. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


लसणीमध्ये सल्फर कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्या सेवनाने लिपिड प्रोफाईल सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर सामान्य होते ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.


लसणीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.यामुळे शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने वाढत्या वयाचा वेग कमी करता येतो.


दरम्यान, कच्चा लसूण खाण्याचे काही नुकसानही आहेत. यामुळे मळमळणे, गॅससारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज एक लसणाची कळी खायला सुरूवात करा.


जे लोक विशिष्ट औषधे घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लसूण खाल्ली नाही पाहिजे. जर तुम्हाला कच्चा लसूण खायचा नसेल तर डाळ, भाजीमध्ये लसणीचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या