Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न झाल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या झोपेवरही परिणाम होत आहे.


अनेक लोक असे आहेत ज्यांना बेडवर पडल्यानंतरही झोप येत नाही. जर झोप आलीच तरी सतत जाग येत असते. यामुळे सकाळी उठल्यावर त्यांना एनर्जेटिक वाटत नाही.


झोपेची समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. अशीच एक पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की रात्री झोपण्याआधी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गाढ झोप येते.


असे म्हटले जात आहे की सलग २१ दिवसांपर्यंत रात्री झोपण्याआधी लसूण खाल्ल्याने चांगल्या झोपेसोबत शरीरास अनेक फायदे मिळतात.


आरोग्य तज्ञांच्या मते लसूण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला आज लसूण खाण्याच्या फायद्याबद्दल सांगत आहोत.


लसणीमध्ये एलीसिन नावाचे एजंट असते जे नियमितपणे खाल्ल्याने प्रत्येक प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षा मिळते. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


लसणीमध्ये सल्फर कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्या सेवनाने लिपिड प्रोफाईल सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर सामान्य होते ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.


लसणीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.यामुळे शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने वाढत्या वयाचा वेग कमी करता येतो.


दरम्यान, कच्चा लसूण खाण्याचे काही नुकसानही आहेत. यामुळे मळमळणे, गॅससारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज एक लसणाची कळी खायला सुरूवात करा.


जे लोक विशिष्ट औषधे घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लसूण खाल्ली नाही पाहिजे. जर तुम्हाला कच्चा लसूण खायचा नसेल तर डाळ, भाजीमध्ये लसणीचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन