Garlic: लसूण खाल्ल्याने वाढेल तुमचे आयुष्य, मात्र अशा पद्धतीने करा सेवन

  87

मुंबई: आपल्या चांगल्या आरोग्यासाठी माणसाला ८ ते ८ तासांची झोप गरजेची असते. झोप पूर्ण न झाल्यास अनेक प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागते. बदलत्या लाईफस्टाईलमुळे आपल्या झोपेवरही परिणाम होत आहे.


अनेक लोक असे आहेत ज्यांना बेडवर पडल्यानंतरही झोप येत नाही. जर झोप आलीच तरी सतत जाग येत असते. यामुळे सकाळी उठल्यावर त्यांना एनर्जेटिक वाटत नाही.


झोपेची समस्या दूर करण्यासाठी लोक नानाविध प्रयोग करत असतात. अशीच एक पद्धत सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात दावा केला जात आहे की रात्री झोपण्याआधी कच्च्या लसणाची एक पाकळी खाल्ल्याने गाढ झोप येते.


असे म्हटले जात आहे की सलग २१ दिवसांपर्यंत रात्री झोपण्याआधी लसूण खाल्ल्याने चांगल्या झोपेसोबत शरीरास अनेक फायदे मिळतात.


आरोग्य तज्ञांच्या मते लसूण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. आम्ही तुम्हाला आज लसूण खाण्याच्या फायद्याबद्दल सांगत आहोत.


लसणीमध्ये एलीसिन नावाचे एजंट असते जे नियमितपणे खाल्ल्याने प्रत्येक प्रकारच्या संक्रमणापासून सुरक्षा मिळते. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते.


लसणीमध्ये सल्फर कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्याच्या सेवनाने लिपिड प्रोफाईल सुधारते आणि हाय ब्लड प्रेशर सामान्य होते ज्यामुळे आपले हृदय निरोगी राहते.


लसणीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.यामुळे शरीर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचते. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने वाढत्या वयाचा वेग कमी करता येतो.


दरम्यान, कच्चा लसूण खाण्याचे काही नुकसानही आहेत. यामुळे मळमळणे, गॅससारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे दररोज एक लसणाची कळी खायला सुरूवात करा.


जे लोक विशिष्ट औषधे घेत असतील त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लसूण खाल्ली नाही पाहिजे. जर तुम्हाला कच्चा लसूण खायचा नसेल तर डाळ, भाजीमध्ये लसणीचा वापर करू शकता.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर