Salman Khan : गोळीबारानंतर बिश्नोई गँगची भाईजानला जीवे मारण्याची धमकी!

मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल


मुंबई : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घरावर झालेल्या गोळीबारामुळे (Firing) खळबळ उडाली होती. बिश्नोई गँगने (Bishnoi gang) या गोळीबाराची जबाबदारी घेतली होती. यानंतर आता बिश्नोई गँगने सलमान खानला थेट जीवे मारण्याची धमकी (Death threat) दिली आहे. या प्रकरणी मुंबईच्या साऊथ सायबर पोलीस स्थानकात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. बिष्णोई गँगशी संबंधित व्यक्तींनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ युट्युबवर पोस्ट केला होता. यामध्ये सलमानला जीवे मारण्यासंदर्भात धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.


सायबर पोलिसांनी त्यासंदर्भात ५०६ (२) भादवी कलमांसह ६६ (ड) आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी राजस्थानला एक पथक तपासासाठी पाठवले होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात बनवारीलाल गुज्जर याला राजस्थानमधून अटक केली आहे. गुज्जरला आता मुंबईत आणलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.



कसा झाला होता गोळीबार?


१४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला होता. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली. मुंबई पोलिसांनी तातडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. या घटनेची जबाबदारी तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिष्णोई याने घेतली. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांना गुन्ह्यात वापरलेली दुचाकी सापडली होती. सीसीटीव्ही फूटेजमध्ये पोलिसांना आरोपींचे चेहरे दिसले. या घटनेच्या ७२६६ तासांच्या आत मुंबई पोलिसांनी गुजरातमधून आरोपींच्या मुसक्या आवळल्या.



बिश्नोई समाजाचा सलमान खानवर राग का?


१९९८ साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.


Comments
Add Comment

Mumbai Weather : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट

मुंबई : मुंबईत (Mumbai) आज (22 जून 2026) सकाळपासून जोरदार पावसाला (Rains) सुरुवात झाली असून भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 3

International Yoga day : योग हे समाजाला जोडण्याचे माध्यम

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त मत मुंबई (विशेष प्रतिनिधी ) योगचा

BMC : उत्कृष्ट शासकीय प्रकल्प निर्मितीमध्ये नागरिकांचा सहभाग आणि देखरेख यांना महत्त्व

लिबर्टी उद्यान महानगरपालिका शालेय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे उद्गार मुंबई :

BMC News : मानखुर्दमधील महाराष्ट्र नगर परिसरात तुंबणाऱ्या पाण्यावर उतारा

हिंदमाता, मिलन सबवेच्या धर्तीवर भूमिगत टाकी बांधून ठाणे खाडीत सोडणार मिनी पंपिंग स्टेशनची उभारणी मुंबई

BMC : घाटकोपरमधील जाहिरात फलक दुघर्टना: क्रेन आणि क्रशरचा खर्च सुमारे ४१ लाख रुपये

दोन वर्षांनी राडारोडा उचलेल्या खचाची झाली आठवण मुंबई(विशेष प्रतिनिधी) मुंबईतील घाटकोपर (Ghatkopar) येथील महाकाय

DCM Eknath Shinde : बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युईटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करावी- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बेस्ट कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा म्हणून ३००० रुपये आणि वेटलिजवरील कर्मचाऱ्यांना २००० रुपये मासिक हंगामी