रा. जि.प शाळा चोरढे मराठी येथे साकारला नवागतांचा मेळावा....

मुरुड, (प्रतिनिधी संतोष रांजणकर)
हर्ष हा साकारला मनी
आनंदाच्या या क्षणी
नवागतांचे करी स्वागत
सर्व पालक वृद हे हसत खेळत मुरुड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा चौरढे मराठी येथे आज नवा गताचा मेळावा साकारण्यात आला. मेळाव्याची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालय चोरढे येथून करण्यात आली. नवीन दाखल पात्र सर्व 11 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच एक विद्यार्थी जादा दाखल झाला.


दाखल पात्र सर्व विद्यार्थ्यांची दोन घोडा गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. तसेच लेझीम पथकात सर्व विद्यार्थी सामील झाले होते. काही विद्यार्थी लाटीकाटीचे प्रात्यक्षिक करत होते. खालूबाज्या व इतर वाद्य वृंदाच्या साह्याने पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूण 130 पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. वाद्यवृंदाच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांसमवेत पालक सुद्धा नाचत होते.विदयार्थ्यांनी फटाके वाजवून नवागताचे स्वागत केले. शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर शाळेचे अध्यक्ष, सरपंच, व सौ सविता वाडकर जिल्हा परिषद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.


यानंतर पालक सभा घेण्यात आली. पालक सभेला सर्व पालक उपस्थित होते. शाळा प्रवेशाचा पहिला मेळावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. पहिला दिवस म्हणून मुलांना गोड खाऊ म्हणून खिरीचे वाटप करण्यात आले. पालकां तर्फे मंगळवारी परसबाग तयार करण्याचे ठरवण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी सौं. सविता वाडकर, चेतन पाटील, सरपंच तृप्ती घाग, अध्यक्ष सुरेश ताबडे, सुनील घाग, अनिल चोरढेकर आदी मान्यवर उपस्थित होते.मुख्याध्यापक संगीता भगत, विजय जाधव, राजेंद्र नाईक, रमेश सुभेदार, प्रतिभा वर्तक, जयश्री पंची यांनी कार्यक्रम यशस्वी केला.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला