Post Office Scheme : आनंदवार्ता! पोस्टाने आणली 'ही' भन्नाट योजना

गुंतवणूकदारांना मिळेल दुप्पट परतावा


मुंबई : भविष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच गुंतवणूक (Investment) करणे महत्त्वाचे असते. देशभरात गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध आहेत. दरम्यान पोस्ट ऑफिसद्वारे (Post Office Scheme) अनेक लहान बचत योजना चालवल्या जात आहेत. त्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठा निधी जमा करू शकता. आताही पोस्टाने गुंतवणूकदारांसाठी एक भन्नाट योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळणार असल्याचा दावा पोस्टाकडून करण्यात आला आहे. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.



किसान विकास पत्र योजना


किसान विकास पत्र (KVP) ही पोस्टाची लोकप्रिय योजना आहे. विशेषत: अधिक नफा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास पैसे काही महिन्यांत दुप्पट होणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदार त्यांना हवे तितके पैसे गुंतवू शकणार आहेत. त्याचप्रमाणे त्यांना परतावा देखील मिळणार आहे. किसान विकास पत्र योजनेअंतर्गत एकल आणि दुहेरी दोन्ही खाती उघडता येतात. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलाच्या नावानेही खाते उघडता येते. तसेच, एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते.



योजनेत मिळणार इतका व्याजदर


पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत, व्याज तिमाही आधारावर ठरवला जातो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेत सध्या ७.५ टक्के व्याज दिले जात आहे. हे व्याज वार्षिक आधारावर जारी केले जाते.



५ लाख रुपये गुंतवा १० लाख रुपये मिळवा


जर तुम्ही या योजनेत ५ लाख रुपये गुंतवले आणि मॅच्युरिटीपर्यंत म्हणजेच ११५ महिने या योजनेत पैसे ठेवले तर ७.५ टक्के व्याजाच्या आधारे ५ लाख रुपये मिळतील. याचा अर्थ गुंतवणूकदारांना मुदतपूर्तीवर १० लाख रुपये मिळतील. त्यामुळे या योजनेत केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरु शकते.

Comments
Add Comment

Gujarat Tragedy : वडोदरा-हालोल महामार्गावर उभ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक; ६ जणांचा जागीच मृत्यू, तर २६ प्रवासी जखमी

वडोदरा : गुजरात राज्याला (Gujrat News) हादरवून सोडणारी एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना बुधवारी पहाटे घडली

LPG ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना; 30 जूनपूर्वी 'ही' गोष्ट पूर्ण करा

अन्यथा सबसिडी मिळण्यात अडचण

Delhi Police : राजधानीत दहशतवादी कट उधळला! ISI समर्थित नेटवर्कचा दिल्लीत पर्दाफाश; शस्त्रे-ड्रग्ज तस्करीप्रकरणी सात जण जेरबंद

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांच्या सावटाखाली आल्याचे समोर आले आहे.

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death)

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी