NAM vs ENG: इंग्लडने नामिबियाला हरवले, आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मिळणार सुपर८चे तिकीट

  55

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी झालेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नामिबियाला डीएस नियमानुसार विजयासाठी १० षटकांत १२६ धावा करायच्या करायच्या होत्या. मात्र त्यांनी तीन विकेट गमावत केवळ ८४ धावा केल्या.


यासोबतच इंग्लंडचा नामिबियावर विजय साकारला गेला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे सुपर ८मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कायम आहे. आता जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरवले तर इंग्लंडचा संघ सुपर ८मध्ये पोहोचेल. मात्र जर स्कॉटलंडने कमाल करत ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सुपर ८मध्ये पोहोचतील. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर ८मध्ये पोहोचला आहे.



हॅरी ब्रूकची तुफानी खेळी


इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशातच हा सामना १०-१० षटकांचा होऊ शकला. इंग्लंडने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत पाच बाद १२२ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २० षटकांत नाबाद ४७ धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने १८ बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई

शाळांमध्ये १४ ऑगस्टपासून पसायदानाचे पठण

संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) :

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

देवाला भेटण्यासाठी ५ व्या मजल्यावरून मारली उडी, महिलेची आत्महत्या

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. हिमायतनगर येथील ४३ वर्षीय पूजा

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

शेतीचा दर्जा दिल्याने मत्स्यव्यवसाय प्राधान्याचे क्षेत्र : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा भाग