प्रहार    

NAM vs ENG: इंग्लडने नामिबियाला हरवले, आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मिळणार सुपर८चे तिकीट

  58

NAM vs ENG: इंग्लडने नामिबियाला हरवले, आता ऑस्ट्रेलिया जिंकल्यानंतर मिळणार सुपर८चे तिकीट

मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी झालेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नामिबियाला डीएस नियमानुसार विजयासाठी १० षटकांत १२६ धावा करायच्या करायच्या होत्या. मात्र त्यांनी तीन विकेट गमावत केवळ ८४ धावा केल्या.


यासोबतच इंग्लंडचा नामिबियावर विजय साकारला गेला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे सुपर ८मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कायम आहे. आता जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरवले तर इंग्लंडचा संघ सुपर ८मध्ये पोहोचेल. मात्र जर स्कॉटलंडने कमाल करत ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सुपर ८मध्ये पोहोचतील. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर ८मध्ये पोहोचला आहे.



हॅरी ब्रूकची तुफानी खेळी


इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशातच हा सामना १०-१० षटकांचा होऊ शकला. इंग्लंडने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत पाच बाद १२२ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २० षटकांत नाबाद ४७ धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने १८ बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment

मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना द्या हा पौष्टिक आहार

मुंबई: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या उंचीसाठी

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

लाँग वीकेंडमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणे टाळा!

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यात एक मोठा लाँग वीकेंड येत आहे.