मुंबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४च्या ३४व्या सामन्यात इंग्लंडने नामिबियाला ४१ धावांनी हरवले. १५ जूनला शनिवारी झालेल्या व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात नामिबियाला डीएस नियमानुसार विजयासाठी १० षटकांत १२६ धावा करायच्या करायच्या होत्या. मात्र त्यांनी तीन विकेट गमावत केवळ ८४ धावा केल्या.
यासोबतच इंग्लंडचा नामिबियावर विजय साकारला गेला. या विजयामुळे इंग्लंड संघाचे सुपर ८मध्ये पोहोचण्याच्या शक्यता कायम आहे. आता जर ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडला हरवले तर इंग्लंडचा संघ सुपर ८मध्ये पोहोचेल. मात्र जर स्कॉटलंडने कमाल करत ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सुपर ८मध्ये पोहोचतील. ग्रुप बीमधून ऑस्ट्रेलियाचा संघ आधीच सुपर ८मध्ये पोहोचला आहे.
इंग्लंड आणि नामिबिया यांच्यातील सामन्यात पावसाचा व्यत्यय आला. अशातच हा सामना १०-१० षटकांचा होऊ शकला. इंग्लंडने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना १० षटकांत पाच बाद १२२ धावा केल्या. हॅरी ब्रूकने २० षटकांत नाबाद ४७ धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार आणि दोन षटकार लगावले. तर जॉनी बेअरस्ट्रॉने १८ बॉलमध्ये ३१ धावांची खेळी केली.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…