Mobile: दिवसभरात किती तास वापरला पाहिजे मोबाईल फोन? तुम्हाला माहीत आहे का...

मुंबई: आजच्या काळात मोबाईल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संपूर्ण दिवस हल्ली सगळेच मोबाईलवर असतात. जर एक मिनिटही फोन आपल्या हातात नसेल तर असे वाटते की आपण काही विसरलो आहोत. फोनशिवाय तर अनेकांना चैनही पडत नाही. आपल्या रोजच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.


मात्र तुम्हाला माहीत आहे का प्रमाणापेक्षा अधिक मोबाईल वापरणेही अतिशय धोकादायक आहे. यामुळे आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात नकारात्मक परिणाम होत आहेत. तर दररोज किती तास मोबाईल वापरला पाहिजे हे जाणून घ्या...



मुलांसाठी तसेच किशोरावस्थेतील मुलांसाठी


तज्ञांच्या म्हणण्यानुसार मुले तसेच किशोरवयीन मुलांनी दिवसातून २ तासांपेक्षा अधिक मोबाईलचा वापर करू नये. जास्त फोन पाहिल्याने त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांची झोपही खराब होऊ शकते. याशिवाय त्यांच्या शारिरीक विकासावरही परिणाम होतो.



वयस्कर लोकांसाठी


वयस्कर लोकांनी दिवसांतून ३ ते ४ तास मोबाईल वापरणे हे योग्य मानले जाते. दरम्यान ही वेळ काम आणि त्यांच्या गरजानुसार बदलू शकते. जर दिवसभर तुमचे काम फोन तसेच कम्प्युटरवर असेल तर मध्ये मध्ये ब्रेक घेतला पाहिजे. डोळ्यांना आराम दिला पाहिजे. जास्त फोनच्या वापरामुळे डोळ्यांना थकवा, डोकेदुखी तसेच तणाव येऊ शकतो.



वयोवृद्धांसाठी


वयोवृद्ध लोकांनी फोनचा वापर मर्यादित केला पाहिजे. खासकरून ज्यांना डोळ्यासंबंधित आजार आहेत. त्यांनी दिवसांतून एक ते दोन तास वापर करणे ठीक असू शकते.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास