मिरचीपुराण : कविता आणि काव्यकोडी

वावरातून आले थेट
मी घरची ना दारची
मी लवंगी मिरची
आहे कोल्हापूरची


घरच्या घरी वाळवून
कुटून ठेवतात मला
तिखट हवं तेव्हा
मग येते मी कामाला


खात्री देत नाही मी
विकतच्या मसाल्याची
पोट बिघडलं तुमचं की
बोलणी आम्ही खायची


भाजीत माझा नेहमी
उपयोग होतो खास
माझा बनवलेला ठेचा
झणझणीत झकास


आधी असते हिरवी
नंतर होते लाल
जपून खा मला
नाही तर होतील हाल


जहाल म्हणूनच मला
ओळखतो सारा गाव
मिठासोबत माझेच
अहो, घेतात सारे नाव



काव्यकोडी - एकनाथ आव्हाड


१) कच्च्याची लागते
आंबट फोड
पिकल्यावर होतो
मधुर गोड


रस याचा पिऊन
एकदा तरी पाहा
फळांचा राजा
कोण बरं हा?


२) पाय याचे बारीक
डोक्यावर तुरा
पावसाला झेलून
तो फुलवी पिसारा


नाच त्याचा पाहून
रान सारे डोले
म्याओ म्याओ करून
कोण बरं बोले?


३) गरगर फिरून
दमत कसे नाही
स्वतःसोबत इतरांना
पळवत राही


तीन चमचे बारा वाट्या
त्याच्याकडे असे
वेळेचा हिशोब
कोण सांगताना दिसे?



उत्तर -


१)आंबा


२) मोर


३) घड्याळ

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

एकेकाचे स्वभाव

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर मानुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजात वावरताना आपल्याला विविध स्वभावाची

समुद्र कसे निर्माण झाले?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील शिवम व त्याचे सवंगडी सहलीला गेले असताना दुपारचे जेवण झाल्यावर विश्रांती घेत बसले