कार, बस अथवा ट्रेन....कोणत्याही प्रकारच्या वाहनामध्ये ही असते सुरक्षित सीट

  69

मुंबई: प्रवासादरम्यान हा सवाल प्रत्येकाच्या मनात येतो की ज्या गाडीत ते बसले आहेत तिथे सर्वात सुरक्षित जागा कोणती आहे. आज जाणून घेऊया की कार, ट्रेन, बस आणि विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित मानली जाते.



कारमधील सुरक्षित सीट


जर तुम्ही एखाद्या ७ सीटर कारमध्ये प्रवास करत आहात तर सर्वात पुढची अथवा मागची नव्हे तर मधली सीट ही नेहमी सुरक्षित मानली जाते. जेव्हा तुम्ही लहान कारमध्ये बसला तेव्हा ही मधली सीट ही सुरक्षित मानली जाते.



बसमधील सुरक्षित सीट


जर तुम्ही बसमधून प्रवास करत आहात तर प्रयत्न करा की ३० ते ३५ नंबरची सीट घ्या. म्हणजेच जी सीट मधल्या टायरच्या वरती असते ती. ही सीट सर्वात सुरक्षित मानली जाते. जर तुम्ही बसमध्ये या सीटवर असाल तर अपघातावेळेस तुम्ही जखमी होण्याची शक्यता इतर प्रवाशांच्या तुलनेत कमी होते.



रेल्वेमधील सुरक्षित सीट


जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत असाल तर दोन गोष्टी लक्षात घ्या. मधल्या डब्यातून प्रवास करा. दुसरा हा की मधल्या डब्यातील मधल्या जागा बुक करा. मधली सीटमध्ये मिडल बर्थ नव्हे. मधली सीट म्हणजे ३३ ते ३५ नंबरच्या सीट.



विमानात कोणती सीट सुरक्षित


विमानात हे चित्र वेगळे असते. एकीकडे जिथे कार, बस आणि ट्रेनमध्ये सर्वात सुरक्षित सीट मधली मानली जाते. तर विमानात सर्वात सुरक्षित सीट पाठची सीट असते. तज्ञांच्या मते विमानात मागे बसलेल्या प्रवाशांची सुरक्षा इतर प्रवाशांच्या तुलनेने ४० टक्के अधिक असते. कारण विमानाला अपघात झाल्यास मागील बाजूने निघणे सोपे असते. तसेच मागचा भाग इंजिनपासून दूर अल्याने तिथे धोका कमी असतो.

Comments
Add Comment

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

मुंबईत गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल, मेट्रो सुरू ठेवावी

जनता दरबारातील मागणीचा मंत्री मंगलप्रभात लोढा पाठपुरावा करणार मुंबई  : महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईतील रेल्वे प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या माथी

एमआरव्हीसीला द्यावा लागणार ९५० कोटी रुपये निधी मुंबई  : महाराष्ट्र शासनाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एम. यू.