Uniform Scheme : 'एक राज्य एक गणवेश' अंतर्गत विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश उपलब्ध होणार !

  201

शालेय शिक्षण विभागाने दिली 'ही' महत्त्वाची माहिती


मुंबई : राज्यात २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘एक राज्य एक गणवेश’ अशा योजनेची (One State One Uniform Scheme) अंमलबजावणी करण्यात आली आहे. याअंतर्गत शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इयत्ता पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एक नियमित स्वरूपाचा गणवेश तर स्काऊट व गाईड या विषयासाठी दुसरा गणवेश असणार आहे.


मागील काही वर्षांपासून राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये गणवेशाचे कापड व शिलाई करून विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्यात येत होते. या प्रक्रियेमध्ये गणवेशाच्या रंगसंगतीमध्ये एकसमानता नसून शालेय समिती व मुख्याध्यापकांना कापडाच्या दर्जाबाबत परिपूर्ण माहिती नसल्याने बऱ्याचदा कमी दर्जाचे कापड प्राप्त होणे अशा त्रुटी आढळून आल्या होत्या. या बाबींचा विचार करून शासनाकडून 'एक राज्य एक गणवेश' योजना राबविण्यात येत आहे.



४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश


शालेय शिक्षण विभागाकडून (Education Department) विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाच्या शिलाईचे काम जोमाने सुरू असून विद्यार्थ्याना लवकरात लवकर गणवेश उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील ४४ लाख ६० हजार ४ विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. गणवेशासाठी प्रती गणवेश ३०० रुपये आर्थिक तरतूद उपलब्ध असून यामध्ये १९० रुपये कापड खरेदीकरिता तर ११० रुपये शिलाई, अनुषंगिक खरेदी आणि वाहतुकीकरिता निश्चित करण्यात आले, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.


दरम्यान, महिला आर्थिक विकास महामंडळाकडून गणवेशाच्या शिलाईचे काम सुरू असून ते लवकरात लवकर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या