Spicejet Airline : हवाई प्रवाशांची मागणी घटल्याने हैदराबाद-अयोध्या विमानसेवा ठप्प!

स्पाईसजेट कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय


नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी स्पाईसजेटने (Spicejet) दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा केली होती. मात्र अयोध्येला जाणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे पाहून या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाईन कंपनीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर, जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवीन उड्डाणे सुरु केली होती. परंतु आता प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर या एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण १ जून रोजी केले असल्याची माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिली.



मागणीनुसार चालवली जातात विमाने


स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली तरीही अयोध्या-चेन्नई मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच, व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात, असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले.

Comments
Add Comment

Petrol-Diesel Stock : देशात पेट्रोल-डिझेल, एलपीजी, नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलाचा पुरेसा साठा - केंद्र सरकार

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशात

Cockroach Janata Party : ‘कॉकरोच जनता पार्टी’ला दिल्ली उच्च न्यायालयाचा दणका; सोशल मीडिया खाते पूर्ववत करण्याबाबत दिला मोठा निर्णय

नवी दिल्ली : अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील ‘कॉकरोच जनता पार्टी’ला (Cockroach Janata Party - CJP) दिल्ली उच्च न्यायालयाकडून

IPL Final 2026 : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! IPL फायनलसाठी मुंबई ते अहमदाबाद धावणार 'स्पेशल ट्रेन'

मुंबई : अहमदाबाद (Ahemdabad) येथे होणाऱ्या आयपीएल (IPL) २०२६ च्या महामुकाबल्याचा थरार प्रत्यक्ष स्टेडियममध्ये जाऊन अनुभवू

Nisos Keros Indian Ship : आनंदवार्ता! होर्मुज सामुद्रधुनी पार करत ‘निसोस केरोस’ जहाज भारताकडे रवाना

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीदरम्यान भारतासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Crime News : ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू आणि पतीला CBI कोठडी

भोपाळ : जिल्हा सत्र न्यायालयाने ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी सासू गिरीबाला सिंह आणि पती समर्थ सिंह या दोघांना

Betwa River Bridge Collapses : उत्तर प्रदेशात बेतवा नदीवरील बांधकामाधीन पुलाचा स्लॅब कोसळून सहा मजुरांचा मृत्यू;अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

- बचाव कार्यासाठी एसडीआरएफ पथक तैनात; जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी लखनऊ : उत्तर प्रदेशातील हमीरपूर