Spicejet Airline : हवाई प्रवाशांची मागणी घटल्याने हैदराबाद-अयोध्या विमानसेवा ठप्प!

स्पाईसजेट कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय


नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी स्पाईसजेटने (Spicejet) दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा केली होती. मात्र अयोध्येला जाणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे पाहून या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाईन कंपनीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर, जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवीन उड्डाणे सुरु केली होती. परंतु आता प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर या एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण १ जून रोजी केले असल्याची माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिली.



मागणीनुसार चालवली जातात विमाने


स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली तरीही अयोध्या-चेन्नई मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच, व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात, असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले.

Comments
Add Comment

‘मी तुमच्या मुलीच्या वयाची आहे’; स्टेजवरूनच प्रांजल दहियाने गैरवर्तन करण्याऱ्या प्रेक्षकांना सुनावले खडेबोल

हरियाणा : हरियाणाची प्रसिद्ध गायिका आणि नृत्यांगना प्रांजल दहिया सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. एका लाइव्ह

टाटा–एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेसला भीषण आग, २० हून अधिक प्रवासी जखमी, १ मृत्यू

आंध्र प्रदेश : आंध्र प्रदेशातील अनाकापल्ली जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री भीषण रेल्वे अपघात घडला.

चिनाब नदीवर जलविद्युत प्रकल्पासाठी निविदा िनघणार

पाकिस्तानचे पाणी थांबणार नवी दिल्ली : भारताने जम्मू-कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर २६० मेगावॅट

राहुल बाबा, इतक्यात थकू नका; अजून बरेच पराभव पाहायचे आहेत

गृहमंत्री अमित शहा यांचा टोला अहमदाबाद : "काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वारंवार होणाऱ्या पराभवामुळे आताच थकून

पॅराग्लायडिंग करताना अपघात, पर्यटकासह दोघे आकाशातून कोसळले, एकाचा मृत्यू

बीर बिलिंग : पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'बीर बिलिंग'मध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे.

'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींनी घेतला वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच रविवार २८ डिसेंबर २०२५ रोजी १२९ व्या 'मन की बात'