Spicejet Airline : हवाई प्रवाशांची मागणी घटल्याने हैदराबाद-अयोध्या विमानसेवा ठप्प!

स्पाईसजेट कंपनीने घेतला 'हा' मोठा निर्णय


नवी दिल्ली : काही महिन्यांपूर्वी स्पाईसजेटने (Spicejet) दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, बेंगळुरू, पाटणा आणि दरभंगासह आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवी उड्डाणे सुरू करून आपल्या नेटवर्कचा विस्तार करत आहोत, अशी घोषणा केली होती. मात्र अयोध्येला जाणाऱ्या हवाई प्रवाशांच्या संख्येत घट झाल्याचे पाहून या कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, एअरलाईन कंपनीने रामलल्ला प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर, जानेवारी महिन्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आठ शहरांमधून अयोध्येसाठी नवीन उड्डाणे सुरु केली होती. परंतु आता प्रवाशांची मागणी घटल्याने स्पाईसजेटने ही विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादवरून अयोध्येला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा विमानसेवा सुरू करण्यात आली होती. मात्र मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची संख्या कमी झाल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे. तर या एअरलाइनने आपले अखेरचे उड्डाण १ जून रोजी केले असल्याची माहिती स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने दिली.



मागणीनुसार चालवली जातात विमाने


स्पाइसजेटने हैदराबादहून अयोध्येसाठीची विमान सेवा बंद केली असली तरीही अयोध्या-चेन्नई मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. तसेच, व्यावसायिक व्यवहार्यता आणि प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन उड्डाणे निर्धारित केली जातात, असेही एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने म्हटले.

Comments
Add Comment

Iran Israel War : अमेरिकेच्या 'त्या' दाव्यांना भारताने फेटाळून लावले

अमेरिका इराणविरुद्ध लष्करी कारवाईसाठी भारतीय बंदरे आणि नौदल तळांचा वापर करत असल्याच्या दाव्यांना भारताने

UN मध्ये भारताची दहशतवादाविरोधात कडक भूमिका

- ISIS-अल-कायदाविरुद्ध जागतिक कारवाईचे आवाहन भारताने संयुक्त राष्ट्रात दहशतवादाविरोधात अत्यंत कडक भूमिका घेतली

Bihar Politics: बिहारच्या राजकारणात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री होणार?, नीतीश कुमार राज्यसभेवर जाणार?

मुंबई: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी

भारताच्या सागरी सीमेजवळ पोहोचलं युद्ध

पाणबुडी हल्ल्यात १०१ सैनिकांसह इराणी युद्धनौका बुडाली, ७८ जखमी नवी दिल्ली : हिंदी महासागरात श्रीलंकेच्या

India-Finland Bilateral relations : भारत आणि फिनलँडमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होतील - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या दौऱ्यावर असलेल्या फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांचे

पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील संघर्षामुळे दीड हजारांपेक्षा जास्त उड्डाणे रद्द झाली आहेत. देशाचे नागरी विमान