Sim card: एका फोनमध्ये दोन सिम वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी...

मुंबई: एका स्मार्टफोनमध्ये जर तुम्ही दोन सिम(sim card) वापरत असाल तर मोठी बातमी तुमच्यासाठी आहे. खरंतर, सरकार एका फोनमध्ये दोन सिम चालवल्यास दंड करण्याचा निर्णय घेत आहे. एका रिपोर्टनुसार दूरसंचार नियामकने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की नंबरांचा दुरूपयोग रोखण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे.


नियामकनुसार असे अनेक युजर्स आहेत ज्यांनी आपल्या फोनमध्ये दोन सिम कार्ड ठेवले आहेत मात्र एकाचाच वापर करत आहे. नियामकाच्या म्हणण्यानुसार मोबाईल नंबर ही सरकारची संपत्ती आहे. याला एका मर्यादेपर्यंत दिले जाते. सरकार सिम कार्डच्या बदल्यास शुल्क वसूल करू शकते.



हे सिम कार्ड्स बंद करण्याच्या तयारीत


Traiच्या आकड्यानुसार मोबाईल ऑपरेटर आपला युजरबेस गमावू नये यासाठी जे सिम कार्ड वापरात नाहीत ते बंद करण्याच्या तयारीत आहे. नियमांनुसार जर एखाद्या युजरने सिमकार्ड बराच काळ रिचार्ज केले नाही तर ते ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची सुविधा आहे.


अशातच traiकडून मोबाईल ऑपरेटरवर दंड ठोठावला जाऊ शकतो. आकड्यांनुसार सध्याच्या काळात २१९.१४ मिलियनहून अधिक मोबाईल नंबर्सना ब्लॅकलिस्ट करण्याच्या तयारीत आहे जे बराच काळ वापरले जात नाही आहेत.



या देशांमध्ये मोबाईल नंबरसाठी लागतात पैसे


ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलँड, युके, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बुल्गारिया, कुवैत, नेदरलँड्स, स्वित्झर्लंड, पोलंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क सारख्या देशांमध्ये टेलिकॉम कंपन्या चार्ज घेतात.

Comments
Add Comment

फॉलोअर्सच्या शर्यतीत मुलांचं बालपण धोक्यात, सुधा मूर्तींची सरकारकडे महत्त्वाची मागणी

नवी दिल्ली : इंटरनेटवर आज असंख्य रील्स आणि व्हिडिओ पाहायला मिळतात ज्यात लहान मुलांचा थेट कंटेंट म्हणून वापर केला

उड्डाणं रद्द, तिकीटदर वाढले; हवाई प्रवासातील गोंधळावर सरकारची मोठी कारवाई

नवी दिल्ली : इंडिगोच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय अडचणींमुळे मागील काही दिवसांपासून देशात मोठे विमान प्रवास

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३