G7 Summit: जी७मध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीत, पंतप्रधान बनल्यानंतर पहिला परदेश दौरा

  68

नवी दिल्ली: इटलीमध्ये ग्रुप ऑफ सेव्हन म्हणजेच जी७ देशांची बैठक होत आहे. यावेळेस जी७ शिखर परिषदेचे आयोजन १३ ते १५ जूनपर्यंत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीमध्ये पोहोचले आहेत. शिखर परिषदेदरम्यान भारत एआय, उर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरीय क्षेत्र यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे.


या परिषदेत युक्रेनसोबत सुरू असलेल्या भीषण युद्ध आणि गाझापट्टीच्या संघर्षाचा मुद्दा ऐरणीवर असणार आहे. पंतप्रधान मोदी जी७ शिखर परिषदेत आऊटरीच सत्रात भाग घेणाऱे अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन, इटलीचे जॉर्जिया मेलॉनीसह अनेक जागतिक नेत्यांसोबत द्विपक्षी बैठक करण्याची शक्यता आहे.


या देशासंबोत ते सुरक्षा आणि व्यापार सारख्या मुद्द्यांवर चर्चा करू शकतात. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. इटलीच्या आपुलिया भागातील बोर्गो एग्नाजियाच्या अलिशान रिसॉर्टमध्ये होणाऱ्या जी७ शिखर परिषदेत जागतिक मुद्दयांसह द्विपक्षीय मुद्द्यांवर भाष्य केले जाणार आहे. जी७मध्ये अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली, जर्मनी, कॅनडा आणि जपान या देशांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

सप्तकुंडमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा कहर; २०० हून अधिक जखमी!

छत्रपती संभाजीनगर : प्रसिद्ध अंजिठा लेण्यांजवळील सप्तकुंड धबधबा बघायला आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक

Indore Missing Couple चा अखेर खुलासा झालाच! 'या' कारणामुळे सोनमनेच दिली होती पती राजाला मारण्याची सुपारी

शिलाँग: मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेले इंदूरचे दाम्पत्य बेपत्ता झाल्याप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे आता समोर

हनिमूनला गेलेल्या बेपत्ता जोडप्याचं गूढ अखेर उलगडलं! सोनमनेच काढला पतीचा काटा

शिलाँग: मेघालयातील शिलाँग इथं हनिमूनसाठी गेलेलं दाम्पत्य राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांच्या बेपत्ता

काळाच्या ओघातही टिकून संयुक्त कुटुंबाचे महत्त्व

संघाचे साहित्य प्रत्येक घरांत पोहोचवा : सरसंघचालक मोहन भागवतांची पंच परिवर्तनावर चर्चा कानपूर: कुंभमेळ्यात आपण

नारी शक्तीच्या कामगिरीने संपूर्ण देशाचा अभिमान वाढवला : पंतप्रधान

नवी दिल्ली: आपल्या माता-भगिनी-कन्यांनी प्रत्येक टप्प्यावर आव्हानांना सामोरं जावं लागणारा काळ पाहिला आहे. पण आज,

आसाममध्ये ३.३७ लाख नागरिकांना पुराचा तडाखा, २३ मृत्यू

दिसपूर : आसामच्या १२ जिल्ह्यांमध्ये पुराता तडाखा बसला आहे. याठिकाणचे सुमारे ३.३७ लाख नागरिक अजूनही पुराच्या