PM Modi: कुवैत आग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, २ लाख रूपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली: कुवैत येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात तब्बल ४९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यात ३० भारतीयांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ कुवैत सरकारशी संपर्क साधला आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यास सांगितले.


यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवैत शहरात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाहता परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान कुवैतमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूप्रकरणी लोकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला दरम्यान,


या दरम्यान पंतप्रधानांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती शोक तसेच संवेदना व्यक्त केली. यासोबतच जे जखमी आहेत त्यांनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही केली. तसेच या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीमधून देण्याची घोषणा केली. तसेच जखमींना ५० हजारांची घोषणा करण्यात आली.


 


माझ्या संवेदना सर्व लोकांसोबत आहेत - मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, कुवैत शहरात लागलेल्या आगीची दुर्घटना दु:खद आहे. माझ्या संवेदना त्या सर्व लोकांसोबत आहेत ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. मी प्रार्थना करतो की यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत.


कुवैतमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारत सरकारचे परराष्ट्र राज्य मंत्री किर्तीवर्धन सिंह कुवैतला रवाना झाले आहेत. यातच भारतीय दूतावासाकडून याबाबत आपात्कालीन हेल्पलाईन नंबर (+965-65505246) जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे