PM Modi: कुवैत आग प्रकरणी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक, २ लाख रूपये मदतीची घोषणा

नवी दिल्ली: कुवैत येथे झालेल्या भीषण अग्नितांडवात तब्बल ४९ लोकांचा होरपळून मृत्यू झाला. यात ३० भारतीयांचा समावेश आहे. या घटनेनंतर भारत सरकारने तात्काळ कुवैत सरकारशी संपर्क साधला आणि जखमींवर तातडीने उपचार करण्यास सांगितले.


यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुवैत शहरात लागलेल्या आगीच्या दुर्घटनेला पाहता परिस्थितीची समीक्षा करण्यासाठी एक बैठक घेतली. या बैठकीदरम्यान कुवैतमध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूप्रकरणी लोकांच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला दरम्यान,


या दरम्यान पंतप्रधानांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबाप्रती शोक तसेच संवेदना व्यक्त केली. यासोबतच जे जखमी आहेत त्यांनी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थनाही केली. तसेच या दुर्घटनेत मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना २ लाख रूपये पंतप्रधान सहाय्यता निधीमधून देण्याची घोषणा केली. तसेच जखमींना ५० हजारांची घोषणा करण्यात आली.


 


माझ्या संवेदना सर्व लोकांसोबत आहेत - मोदी


पंतप्रधान मोदी म्हणाले, कुवैत शहरात लागलेल्या आगीची दुर्घटना दु:खद आहे. माझ्या संवेदना त्या सर्व लोकांसोबत आहेत ज्यांनी या दुर्घटनेत आपल्या आप्तस्वकीयांना गमावले आहे. मी प्रार्थना करतो की यात जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावेत.


कुवैतमध्ये घडलेल्या घटनेनंतर भारत सरकारचे परराष्ट्र राज्य मंत्री किर्तीवर्धन सिंह कुवैतला रवाना झाले आहेत. यातच भारतीय दूतावासाकडून याबाबत आपात्कालीन हेल्पलाईन नंबर (+965-65505246) जारी करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च