पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. तर डॉ. पीके मिश्रा यांना पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान म्हटले जाणारे अजित डोवाल १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी प्रमुख असलेले डोवाल ३१ मे २०२४ला पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले होते.


खरंतर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतात. यांचे प्रमुख काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे असते. एनएसएचे हे पद पहिल्यांदा १९९८मध्ये बनवण्यात आले होते जेव्हा देशात दुसऱ्यांदा आण्विक चाचणी करण्यात आली होती. सरकारमध्ये हे पद खूप महत्त्वाचे असते.


मग ते ३७० असो, सर्जिकल स्ट्राईक असो, डोकलाम असो वा राजकीय निर्णय डोवाल हे देशांच्या आशांवर नेहमीच खरे उतरले आहेत. पुलवामाचा बदला तर पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हा निर्णय डोवाल यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता.


डोवाल १९७२मध्ये इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सामील झाले होते. आपल्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ ७ वर्षे पोलीसांची वर्दी घातली कारण डोवाल बराचवेळ देशाच्या गुप्तहेर विभागात काम करत होते. यामुळेच त्यांचे करिअरही तितकेच अनोखे होते.

Comments
Add Comment

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च

Bhopal News: कारमध्ये अडकलेला दीड वर्षांचा चिमुकला,अन् आई वडील शॅापिंगला गेले,पुढे असं घडलं...

भोपाळ :मध्य प्रदेशातील छिंदवाडा शहरात संध्याकाळच्या सुमारास पाया खालची जमीन हलवणारी घटना घडली. पालकांच्या

Crime News: रात्री हलवा खाल्ला अन् सकाळी उठलेच नाही..तिघांचा मृत्यु,घडली विचीत्र घटना..!

चंदीगड : हरियाणातील फरिदाबादच्या सरूरपूर भागात एक भयंकर व पाय खालची जमीन हलवणारी घटना घडली आहे. एका कुटुंबातील

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

Sabarimala Temple : सबरीमाला मंदिरात तूप विक्रीत लाखो रुपयांचा महाघोटाळा! केरळ उच्च न्यायालयाचे कठोर पाऊल; एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश

तिरुअनंतपुरम : केरळमधील जगप्रसिद्ध सबरीमाला मंदिरात सोन्याच्या दरोड्यानंतर आता 'तूप घोटाळा' समोर आल्याने खळबळ