पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

  57

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. तर डॉ. पीके मिश्रा यांना पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान म्हटले जाणारे अजित डोवाल १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी प्रमुख असलेले डोवाल ३१ मे २०२४ला पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले होते.


खरंतर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतात. यांचे प्रमुख काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे असते. एनएसएचे हे पद पहिल्यांदा १९९८मध्ये बनवण्यात आले होते जेव्हा देशात दुसऱ्यांदा आण्विक चाचणी करण्यात आली होती. सरकारमध्ये हे पद खूप महत्त्वाचे असते.


मग ते ३७० असो, सर्जिकल स्ट्राईक असो, डोकलाम असो वा राजकीय निर्णय डोवाल हे देशांच्या आशांवर नेहमीच खरे उतरले आहेत. पुलवामाचा बदला तर पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हा निर्णय डोवाल यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता.


डोवाल १९७२मध्ये इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सामील झाले होते. आपल्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ ७ वर्षे पोलीसांची वर्दी घातली कारण डोवाल बराचवेळ देशाच्या गुप्तहेर विभागात काम करत होते. यामुळेच त्यांचे करिअरही तितकेच अनोखे होते.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने