पंतप्रधान मोदींनी पुन्हा अजित डोवाल यांच्यावर दाखवला विश्वास, तिसऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती

  54

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवताना तिसऱ्यांदा त्यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून निवड केली आहे. तर डॉ. पीके मिश्रा यांना पुन्हा पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांचे डोळे आणि कान म्हटले जाणारे अजित डोवाल १९६८च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. आयबी प्रमुख असलेले डोवाल ३१ मे २०२४ला पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बनले होते.


खरंतर, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे नेतृत्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार करतात. यांचे प्रमुख काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर पंतप्रधानांना सल्ला देणे असते. एनएसएचे हे पद पहिल्यांदा १९९८मध्ये बनवण्यात आले होते जेव्हा देशात दुसऱ्यांदा आण्विक चाचणी करण्यात आली होती. सरकारमध्ये हे पद खूप महत्त्वाचे असते.


मग ते ३७० असो, सर्जिकल स्ट्राईक असो, डोकलाम असो वा राजकीय निर्णय डोवाल हे देशांच्या आशांवर नेहमीच खरे उतरले आहेत. पुलवामाचा बदला तर पाकिस्तान कधीच विसरणार नाही. हा निर्णय डोवाल यांच्या नेतृत्वात घेण्यात आला होता.


डोवाल १९७२मध्ये इंटेलिजेन्स ब्युरोमध्ये सामील झाले होते. आपल्या ४६ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी केवळ ७ वर्षे पोलीसांची वर्दी घातली कारण डोवाल बराचवेळ देशाच्या गुप्तहेर विभागात काम करत होते. यामुळेच त्यांचे करिअरही तितकेच अनोखे होते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )