Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित! सरकारला दिला एक महिन्याचा अवधी

म्हणाले, एका महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत...


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मराठा आरक्षणात सगेसोयरेंच्या मागणीची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी (Antarwali sarati) येथे जाऊन जरांगेंना भेटल्याने सहाव्या दिवशी त्यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र, यावेळेस त्यांनी सरकारला एक कडक इशारा दिला आहे.


सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेतली. यावेळी सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला, तो जरांगेंनी मान्य केला आहे. जरांगे पाटील यांनी आधी सरकारला जे काही कारायचे आहे ते ३० जूनच्या आधी करावे, असे म्हटले होते. मात्र, शंभूराज देसाईंनी समजूत काढल्यानंतर जरांगे पाटील सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यास तयार झाले आहेत.



सरकारला दिला कडक इशारा


या भेटीवेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराही दिला आहे. ते म्हणाले, 'जर एका महिन्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू'. त्यामुळे आता सरकार नेमके काय प्रयत्न करणार आणि महिन्याभरात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)