Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित! सरकारला दिला एक महिन्याचा अवधी

म्हणाले, एका महिन्यात मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभा निवडणुकीत...


जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणारे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) निकालानंतर पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मराठा आरक्षणात सगेसोयरेंच्या मागणीची अंमलबजावणी करण्यात यावी, यासाठी त्यांनी पुन्हा उपोषण सुरु केले होते. दरम्यान, आज सरकारचे शिष्टमंडळ अंतरवाली सराटी (Antarwali sarati) येथे जाऊन जरांगेंना भेटल्याने सहाव्या दिवशी त्यांनी उपोषणाला स्थगिती दिली आहे. मात्र, यावेळेस त्यांनी सरकारला एक कडक इशारा दिला आहे.


सरकारचे प्रतिनिधी म्हणून आज कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भेट घेतली. यावेळी सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ मागितला, तो जरांगेंनी मान्य केला आहे. जरांगे पाटील यांनी आधी सरकारला जे काही कारायचे आहे ते ३० जूनच्या आधी करावे, असे म्हटले होते. मात्र, शंभूराज देसाईंनी समजूत काढल्यानंतर जरांगे पाटील सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यास तयार झाले आहेत.



सरकारला दिला कडक इशारा


या भेटीवेळी जरांगे पाटील यांनी सरकारला इशाराही दिला आहे. ते म्हणाले, 'जर एका महिन्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भातील मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरू'. त्यामुळे आता सरकार नेमके काय प्रयत्न करणार आणि महिन्याभरात जरांगेंच्या मागण्या पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन