BAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. मात्र नेदरलँड्सला केवळ ८ बाद १३४ धावा करता आल्या. बांगलादेशच्या या विजयामुळे त्यांचे सुपर८मधील आव्हान कायम राहिले आहे.


नेदरलँड्सकडून सुरूवात ठीक झाली. नेदरलँड्सच्या पहिल्या पाच फलंदाजांनी थोडीफार धावसंख्या केली. मात्र खालच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले यामुळे नेदरलँड्सला केवळ १३४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.


तत्पूर्वी, बांगलादेशच्या डावाची सुरूवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकांत कर्णधार नजमुल हुसैन शांतो केवळ एक धाव करून बाद झाला. शांतो बाद झाला न झाला तोच लिटन दासही एक धाव करून बाद झाला. अशातच शाकिब अल बसन आणि तनजिद हसन यांच्यात ४८ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. त्यांनी मिळून बांगलादेशची धावसंख्या ८ षटकांत ७० धावांवर पोहोचवला. मात्र ९व्या षटकांत तनजिद ३५ धावांवर बाद झाला.


ताहिदने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र तोही ९ धावा करून बाद झाला. महमदुल्लाहने मधल्या षटकांमध्ये शाकिबची साथ दिली आणि ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकांपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ४ बाद १२८ इतकी होती. १८व्या षटकांत वॅन मीकेरनने महमदुल्लाहला बाऊंड्रीकडे कॅच दिला. त्याने २५ धावा केल्या. १९व्या षटकांत बांगलादेशने १४ धावा केल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये १२ धावा आल्या. यामुळे बांगलादेशला १५९ पर्यंत धावसंख्या गाठता आली.

Comments
Add Comment

भर लग्नसमारंभात जीवघेणा हल्ला; बुलढाण्यात तरुण......

बुलढाणा : आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्याला अचानक हिंसाचाराचे गालबोट लागल्याची धक्कादायक घटना

दिग्दर्शक बुची बाबू सना यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेड्डी’ टीमकडून खास भेट; BTS व्हिडिओ प्रदर्शित

मुंबई : ‘पेड्डी’मधील पहिले गाणे ‘चिकीरी’ने आधीच सर्व प्लॅटफॉर्म्सवर 200 दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. या

‘जय सोमनाथ’साठी बॉलिवूडचे दिग्गज करणार महायुती

मुंबई : ऐतिहासिक सोमनाथ मंदिरावर १०२६ मध्ये पहिल्यांदा हल्ला झाला. यानंतर वारंवार हल्ले झाले. या सर्व

बिग बॉस फेम कलाकाराचे 'तुरू तुरू' गाणे सुपरहिट, दोन दिवसांत दहा लाखांपेक्षा जास्त व्हयूज

मुंबई : मराठी म्युझिक इंडस्ट्रीत सध्या ‘तुरू तुरू’ या नव्या गाण्याची जोरदार चर्चा रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांत

रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ घडली धक्कादायक घटना, बघून अनेकजण हादरले

चंद्रपूर : रेल्वेच्या हद्दीत विजेच्या खांबाजवळ एक धक्कादायक घटना घडली. ही घटना बघून अनेकजण हादरले. एका तरुणाने

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद