मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. मात्र नेदरलँड्सला केवळ ८ बाद १३४ धावा करता आल्या. बांगलादेशच्या या विजयामुळे त्यांचे सुपर८मधील आव्हान कायम राहिले आहे.
नेदरलँड्सकडून सुरूवात ठीक झाली. नेदरलँड्सच्या पहिल्या पाच फलंदाजांनी थोडीफार धावसंख्या केली. मात्र खालच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले यामुळे नेदरलँड्सला केवळ १३४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या डावाची सुरूवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकांत कर्णधार नजमुल हुसैन शांतो केवळ एक धाव करून बाद झाला. शांतो बाद झाला न झाला तोच लिटन दासही एक धाव करून बाद झाला. अशातच शाकिब अल बसन आणि तनजिद हसन यांच्यात ४८ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. त्यांनी मिळून बांगलादेशची धावसंख्या ८ षटकांत ७० धावांवर पोहोचवला. मात्र ९व्या षटकांत तनजिद ३५ धावांवर बाद झाला.
ताहिदने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र तोही ९ धावा करून बाद झाला. महमदुल्लाहने मधल्या षटकांमध्ये शाकिबची साथ दिली आणि ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकांपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ४ बाद १२८ इतकी होती. १८व्या षटकांत वॅन मीकेरनने महमदुल्लाहला बाऊंड्रीकडे कॅच दिला. त्याने २५ धावा केल्या. १९व्या षटकांत बांगलादेशने १४ धावा केल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये १२ धावा आल्या. यामुळे बांगलादेशला १५९ पर्यंत धावसंख्या गाठता आली.
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…