BAN vs NED: शाकिबच्या अर्धशतकाच्या जोरावर बांगलादेशने नेदरलँड्सला हरवले, सुपर८मधील आव्हान कायम

  68

मुंबई: शाकिब अल हसनने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर नेदरलँड्सला २५ धावांनी हरवले. बांगलादेशने नेदरलँड्सला विजयासाठी १६० धावांचे आव्हान दिले होते. मात्र नेदरलँड्सला केवळ ८ बाद १३४ धावा करता आल्या. बांगलादेशच्या या विजयामुळे त्यांचे सुपर८मधील आव्हान कायम राहिले आहे.


नेदरलँड्सकडून सुरूवात ठीक झाली. नेदरलँड्सच्या पहिल्या पाच फलंदाजांनी थोडीफार धावसंख्या केली. मात्र खालच्या फळीतील फलंदाज सपशेल अपयशी ठरले यामुळे नेदरलँड्सला केवळ १३४ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली.


तत्पूर्वी, बांगलादेशच्या डावाची सुरूवात खराब झाली कारण दुसऱ्याच षटकांत कर्णधार नजमुल हुसैन शांतो केवळ एक धाव करून बाद झाला. शांतो बाद झाला न झाला तोच लिटन दासही एक धाव करून बाद झाला. अशातच शाकिब अल बसन आणि तनजिद हसन यांच्यात ४८ धावांची महत्त्वाची भागीदारी झाली. त्यांनी मिळून बांगलादेशची धावसंख्या ८ षटकांत ७० धावांवर पोहोचवला. मात्र ९व्या षटकांत तनजिद ३५ धावांवर बाद झाला.


ताहिदने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला मात्र तोही ९ धावा करून बाद झाला. महमदुल्लाहने मधल्या षटकांमध्ये शाकिबची साथ दिली आणि ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. १७व्या षटकांपर्यंत बांगलादेशची धावसंख्या ४ बाद १२८ इतकी होती. १८व्या षटकांत वॅन मीकेरनने महमदुल्लाहला बाऊंड्रीकडे कॅच दिला. त्याने २५ धावा केल्या. १९व्या षटकांत बांगलादेशने १४ धावा केल्या. तर शेवटच्या ओव्हरमध्ये १२ धावा आल्या. यामुळे बांगलादेशला १५९ पर्यंत धावसंख्या गाठता आली.

Comments
Add Comment

Vande Bharat Express: मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस १६ जूनपासून आठवड्यातून तीनच दिवस

रत्नागिरी: भारतीय रेल्वेने मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसच्या (22229/22230) २०२५ च्या मान्सून कालावधीसाठी

विठ्ठल-रुक्मिणीचे २७ जूनपासून मिळणार २४ तास दर्शन

सोलापूर : आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. या आषाढी

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

वट पौर्णिमा २०२५ : वडाच्या साक्षीने अखंड सौभाग्यासाठीचा व्रत जाणून घ्या सर्व माहिती

मुंबई - भारतीय संस्कृतीत विवाहित महिलांसाठी अनेक व्रतवैकल्यांची परंपरा आहे, परंतु काही व्रतं अशी असतात जी

जागतिक महासागर दिवस २०२५: भारतातील ५ सर्वात स्वच्छ किनारे कोणते आहेत जे तुम्ही एक्सप्लोर केले पाहिजेत?

देश-विदेशातील लोक भारताची संस्कृती, खाद्यपदार्थ आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी येतात. आता जर तुम्ही कुठेतरी

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,