माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

  38

कल्याण : कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. झाले. ही घटना बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. मागील काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक डोंगरकडा पडला. त्यामुळे या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका काका-पुतण्याचा समावेश आहे. ३० वर्षीय राहुल भालेराव आणि ७ वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर, तीनजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे राहणारे भालेकर कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापुरी येथे मूळ गावी जात होते. कल्याणकडून नगरकडे जात असताना मुरबाड सोडल्यानंतर टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या रिक्षावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यावेळी रिक्षातील तिघांना तातडीने आपले स्वत:चे प्राण वाचवले. पण, दुर्दैवाने या अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.


दरवर्षी दरड कोसळण्याच्या घडतात घटना


पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात पण या भागात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून वाहतूक करणारे प्रवासी देखील जीव मुठीत घेऊन ये-जा करत असतात. या भागात काही ठिकाणी नेट फेंसिंग केले आहे. मात्र हा भाग दरडरडप्रवण क्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी असे अपघात होत असतात.

Comments
Add Comment

आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी होणार- चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : राज्यातील आदिवासींच्या जमिनींचे बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या

पडळकरांनी सांगितलेलं 'ते' कॉकटेल घर तुम्हाला माहिती आहे का?

पडळकरांची 'कॉकटेल कुटुंब' टिप्पणी, पवारांना अप्रत्यक्ष

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात प्रथमच डिजिटल क्रांती ; AI तंत्रज्ञानासाठी ऐतिहासिक करार

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा पहिला करार! मंत्री

कल्याण पश्चिम परिसरात ऐन पावसाळ्यात कचऱ्यांचे ढीग, तीन दिवसांपासून घंटागाड्यांची प्रतीक्षा

कल्याण (प्रतिनिधी) : केडीएमसीने शहर स्वच्छ सुंदर असावे यासाठी कोट्यवधींची तरतूद केलेली असताना, कल्याण-डोंबिवली

वारीदरम्यान ९ लाखांहून अधिक वारकऱ्यांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

सोलापूर : आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर व इतर जिल्ह्यांतून आलेल्या वारकरी भक्तांना सार्वजनिक

11th Admission: अकरावीच्या पहिल्या फेरीत सहा हजार विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारले, कारण...

योग्य कागदपत्रे सादर न केल्याने, तसेच अर्जामध्ये चुका करण्यात आल्याने प्रवेश नाकारला मुंबई: राज्यात अकरावी