माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू

कल्याण : कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. झाले. ही घटना बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. मागील काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक डोंगरकडा पडला. त्यामुळे या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका काका-पुतण्याचा समावेश आहे. ३० वर्षीय राहुल भालेराव आणि ७ वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर, तीनजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे राहणारे भालेकर कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापुरी येथे मूळ गावी जात होते. कल्याणकडून नगरकडे जात असताना मुरबाड सोडल्यानंतर टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या रिक्षावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यावेळी रिक्षातील तिघांना तातडीने आपले स्वत:चे प्राण वाचवले. पण, दुर्दैवाने या अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.


दरवर्षी दरड कोसळण्याच्या घडतात घटना


पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात पण या भागात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून वाहतूक करणारे प्रवासी देखील जीव मुठीत घेऊन ये-जा करत असतात. या भागात काही ठिकाणी नेट फेंसिंग केले आहे. मात्र हा भाग दरडरडप्रवण क्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी असे अपघात होत असतात.

Comments
Add Comment

शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्था येत्या ३० एप्रिलपर्यंत गॅस सिलिंडरचा पुरवठा

मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिजविलेला आहार पुरवठा करणा-या महिला

Missing Link' Project: मुंबई-पुण्यातील अंतर कमी होणार, 'मिसिंग लिंक'चं काम पूर्ण; लवकरच प्रवाशांसाठी खुला

मुंबई: बहुप्रतीक्षित मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचं काम पूर्ण झालं आहे. या प्रोजेक्टशी संबंधित असलेल्या एक

कागलमध्ये ३५७.९९ कोटींचा एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान व केंद्रीय मंत्री गडकरींचे आभार व्यक्त

कोल्हापूर: कोल्हापूरच्या कागल येथे राष्ट्रीय महामार्ग-48 वर 6-लेन एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी मिळाली आहे.३५७.९९

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ