मान्सूनपूर्व पावसाने तळा तालुक्यात पुन्हा विजेचा लपंडाव

विजेचा पाच तासांचा ब्रेक; विजेअभावी नागरिकांची होते गैरसोय


तळा : पावसाळा सुरू होताच, तळा तालुक्यातील बत्तीगुल होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. दरवर्षी पावसाच्या आगमनापासूनच तळा तालुक्यात विजेचा लपंडाव सुरू होतो आणि एकदा गेलेली वीज जवळजवळ ४ ते ५ तास येत नाही. यामुळे विजेअभावी नागरिकांची मोठी गैरसोय होते.


पावसाळा सुरू व्हायच्या आधी महावितरण विभागाने झाडे तोडणे, बॉक्स मेंटेनन्स, ब्रेकर मेंटेनन्स, जिओडी मेंटेनन्स, जीर्ण खांब बदलणे यांसारखी पावसाळ्यापूर्वी करावयाची कामे वेळीच पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र पावसाळा तोंडावर आला असताना देखील महावितरण विभागाची ही कामे पूर्ण झाली नव्हती. परिणामी जराजरी ढगांचा गडगडाट अथवा रिमझिम पावसाला सुरुवात होताच, महावितरण विभागाकडून तळा तालुक्याची बत्तीगुल करण्यात येते. यामुळे पावसाळ्यात जरी नागरिकांना थंडावा जाणवत असला, तरी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना रात्रभर मच्छरांचा सामना करावा लागतो.


काही वेळा मुसळधार पावसामुळे संपूर्ण दिवसभर देखील तालुक्याचा वीजपुरवठा खंडित करण्यात येतो व याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, वीजबिल वसुलीसाठी महावितरण जेवढ्या तत्परतेने मेहनत घेते, ती मेहनत पावसाळी वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी का घेत नाही, असा प्रश्न देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


पावसाला अद्याप सुरुवात झाली आहे. मात्र तळा गावात सतत ४ ते ५ तास वीज जात असल्याने, ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावातील सगळीच कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे मातीची रास रस्त्यावर साचली आहे. वाहनांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात गावातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वीजबील वसुली केली जाते. मात्र तेवढ्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये बरीच नाराजी व्यक्त होत आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या

Ketan Agrawal Murder Case : "सिया दोषी असेल तर तिलाही त्याच दरीत ढकला!"; आई-वडिलांचा संताप, पोलिसांकडून ९ प्रश्नांची सरबत्ती

पुणे : पुण्याला हादरवून सोडणाऱ्या केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या प्रकरणाचा तपास आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन