'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देणा-या गुंडाला नागरिकांनी कोर्टातच धूतले!

बेळगाव : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देणारा गुंड जयेश पुजारीला (Jayaesh Pujari) आज बेळगाव मध्ये कोर्टात आणले होते. यावेळी तो कोर्टात सातत्याने 'पाकिस्तान झिंदाबाद' च्या घोषणा देत असल्याचे पाहून संतप्त नागरिकांनी त्याची कोर्टातच चांगलीच धुलाई केली. दरम्यान जयेश याच्यावर पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्याचेही आरोप आहेत. तो या प्रकरणी सध्या अटकेत आहे.


जयेश पुजारी सध्या हिंडलगा तुरुंगात आहे. त्याला आज बेळगाव कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्याने आपण पोलिसांसमोर वारंवार आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करत असता ते ऐकून घेत नसल्याचा आरोप करत 'पाकिस्तान जिंदाबाद' च्या घोषणा दिल्या. जयेशच्या घोषणांनी नागरिकही संतापले आणि त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. दरम्यान पोलिसांनी त्याला तेथून बाहेर काढले पण यामुळे काही काळ कोर्ट परिसरामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होती..





काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना जयेशने लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. तपासणीमध्ये त्याच्या पोटात वायरीचे तुकडे आढळून आले आहेत. मात्र तो ठीक आहे.


बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)

Deepika Padukone : दीपिकाची AI मध्ये 'व्हॉइस' एन्ट्री! 'Chat Soon' म्हणत अभिनेत्रीने मिळवला जागतिक प्लॅटफॉर्मवर खास स्थान

सहा देशांसाठी दीपिका पदुकोण बनली इंग्रजी व्हॉइस बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने

पंतप्रधान मोदी १३ हजार ४३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते १३ हजार ४३० कोटी

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक