Dombivli MIDC : धक्कादायक! डोंबिवली कारखान्यात पुन्हा अग्नितांडव, परिसरात धुराचे लोट

  82

आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


मुंबई : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाच्या धक्क्यातून परिसरातील नागरिक सावरले नसताना अशातच आणखी एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आह. डोंबिवली येथे अभिनव शाळेजवळ असलेल्या इंडो-अमाईन्स या कंपनीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून स्फोटांचे मोठ्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कामगार, रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे. मात्र स्फोटाचे सत्र सुरुच असल्यामुळे डोंबिवली शहर हादरले आहे. (Dombivali MIDC Fire)



नेमके काय घडले


आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) फेज २ मध्ये ही आग लागली. मागच्या वेळी स्फोट झालेल्या अमुदान कंपनीच्याच बाजूला असलेल्या इंडो-अमाईन्स कंपनीत ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. निवासी भाग आणि केमिकल कंपन्या जवळ असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.


स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. ही एक केमिकल कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग मोठी असून कारखान्यात सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.


त्याचबरोबर या एमआयडीसी परिसरात एक शाळा देखील आहे. आग आणि स्फोटांची मालिका पाहून शाळेने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे नागरिकांकडून काहीसा सुटकेचा निश्वास टाकला जात आहे.


दरम्यान, या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सकाळी कारखान्याच्या आसपास मजूस दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



सरकारच्या कारभारावर नागरिकांचा प्रश्न


अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुन्हा एकदा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्याने कंपनी मालक पुन्हा नागरिक, शासन, चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत. एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

Comments
Add Comment

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी, काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम, दोन दिवस पावसाचा अंदाज

मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबईत सकाळपासून पावसाची हजेरी केली आहे. सकाळपासून रिमझिम पावसाळा सुरुवात

मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, तासाभरात २० मिमी. पावसाची नोंद

मुंबई : मागच्या आठवड्याच्या सुरुवातीला पावसानं मुंबईला झोडपलं. यानंतर चार दिवस विश्रांती घेऊन पाऊस पुन्हा हजर

मुंबई : एकनाथ शिंदेंच्या खात्यावर मुख्यमंत्र्यांची नाराजी, बैठकीला शिंदे उपस्थित नसल्याची माहिती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येत असताना

Health: मुलांची उंची आणि चांगले आरोग्य वाढवण्यासाठी उपयुक्त पदार्थ

मुंबई : मुलांच्या योग्य शारीरिक वाढीसाठी त्यांना योग्य आहार देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः त्यांची उंची