मुंबई : काही दिवसांपूर्वी डोंबिवलीमधील अमुदान कंपनीत झालेल्या स्फोटाच्या धक्क्यातून परिसरातील नागरिक सावरले नसताना अशातच आणखी एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आह. डोंबिवली येथे अभिनव शाळेजवळ असलेल्या इंडो-अमाईन्स या कंपनीत आग लागल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे हवेत मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले असून स्फोटांचे मोठ्या आवाजामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. कामगार, रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले जात आहे. मात्र स्फोटाचे सत्र सुरुच असल्यामुळे डोंबिवली शहर हादरले आहे. (Dombivali MIDC Fire)
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी (Dombivli MIDC) फेज २ मध्ये ही आग लागली. मागच्या वेळी स्फोट झालेल्या अमुदान कंपनीच्याच बाजूला असलेल्या इंडो-अमाईन्स कंपनीत ही दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. निवासी भाग आणि केमिकल कंपन्या जवळ असल्यामुळे भीती व्यक्त केली जात आहे.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसरातील रस्ते बंद केले आहेत. ही एक केमिकल कंपनी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच अग्निशमन दलाचे पाच ते सात बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही आग मोठी असून कारखान्यात सतत स्फोट होत आहेत, त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.
त्याचबरोबर या एमआयडीसी परिसरात एक शाळा देखील आहे. आग आणि स्फोटांची मालिका पाहून शाळेने सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवले आहे. त्यामुळे नागरिकांकडून काहीसा सुटकेचा निश्वास टाकला जात आहे.
दरम्यान, या कारखान्यात मजूर होते का याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सकाळी कारखान्याच्या आसपास मजूस दिसले होते. त्यामुळे या स्फोटावेळी मजूर कारखान्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमुदान कंपनी स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतील ३० कंपन्या बंद करण्यात आल्या आहेत. या कंपन्या अन्य भागात स्थलांतरित करण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात पुन्हा एकदा एमआयडीसीतील रासायनिक कंपनीत आग लागल्याने कंपनी मालक पुन्हा नागरिक, शासन, चौकशी यंत्रणांकडून लक्ष्य होऊ लागले आहेत. एमआयडीसीतील या सततच्या आगीच्या दुर्घटनांमुळे परिसरातील रहिवासी चिंताग्रस्त आहेत. तसेच प्रशासनाला जाग कधी येणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषकाचे (ITC T20 World cup) विजेतेपद पटकावल्याने देशवासीयांमध्ये आनंदाची…
पर्यटनासाठी आले आणि... पुणे : पावसाळा सुरु होताच अनेकजण पर्यटनाचं (Monsoon picnic) आयोजन करतात. मात्र,…
नवी मुंबई : महाराष्ट्र शासनामार्फत बेलापूर गावात होत असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा भाजपाच्या आमदार…
मुंबई : प्रत्येक महिन्याच्या १ तारखेपासून अनके गोष्टींच्या नियमांमध्ये (New Rules) बदल होतात. उद्यापासून म्हणजेच…
सुजाता सौनिक यांची झाली नियुक्ती मुंबई : राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्याच्या मुख्य सचिवपदी (Chief Secretary…
पुण्यात धक्कादायक प्रकारांचे सत्र सुरुच पुणे : पुण्यातील गुन्हेगारीचे (Pune crime) प्रमाण चिंताजनक झाले असतानाच…