T-20 World cup 2024: पाकिस्तानला अखेर विजयाचा सूर गवसला, कॅनडावर ७ विकेटनी मात

न्यूयॉर्क: टी-२० वर्ल्डकपमध्ये(T-20 World cup 2024) आधी यूएसए आणि त्यानंतर भारताकडून पराभव पत्करलेल्या पाकिस्तानची आज कॅनडाच्या संघाविरुद्ध कसोटी होती. या कसोटीत पाकिस्तान खरा उतरला आहे. पाकिस्तानने या सामन्यात कॅनडाला ७ विकेटनी हरवत विजयाला गवसणी घातली. त्यांचा वर्ल्डकपमधील हा पहिलाच विजय आहे.


हा सामना खरंतर पाकिस्तानसाठी करो वा मरो होता. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात नवख्या यूएसएकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने त्यांच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून घेतला. त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचेच होते. अखेर त्यांना विजयी सूर गवसला.


या सामन्यात कॅनडाने पहिल्यांदा फलंदाजी करताना ७ बाद १०६ धावा होत्या. पाकिस्तानसमोर विजयासाठी १०७ धावांचे आव्हान होते. हे आव्हान खरंतर मोठे नव्हते. मात्र ते पूर्ण करताना पाकिस्तानला १७.३ षटके खर्च करावी लागली तसेच ३ विकेटही त्यांनी गमावल्या.


१०७ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरूवात मात्र संथ झाली. सुरूवातीला पाकिस्तानचे फलंदाज धावा काढण्यासाठी धडपडत होते. मात्र सलामीवीर मोहम्मद रिझवान खेळपट्टीवर शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने ५३ धावांची खेळी केली. तर कर्णधार बाबर आझमने ३३ धावा केल्या. बाकी फलंदाज एकेरी धावा करून बाद झाले.


याआधीने कॅनडाने सलामीवीर आरोन जॉन्सनच्या ५२ धावांच्या जोरावर २० षटकांत केवळ १०६ धावा केल्या होत्या. कॅनडाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नव्हते.

Comments
Add Comment

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स